HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्याच्या पाटील इस्टेट झोपडपट्टीला भीषण आग

पुणे | मुंबई रोडवरील पाटील इस्टेट झोपडपट्टीला आज (२८ नोव्हेंबर) दुपारी भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या १० गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत चार झोपड या आगीच्या विळख्यात जळून खाक झाल्या आहेत. या आगीत ६ ते ७ गॅस सिलेंडरचे स्फोट झाल्याने आगीचा आणखी भडका उडाला असून गर्दीमुळे अग्निशामक दलाच्या जवानांना काम करणे अवघड होत आहे.

पाटील इस्टेट झोपडपट्टीतील गल्ली नंबर ३ मधील एका झोपडपट्टीला दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली होती. आग मोठ्या प्रमाणावर पसरण्याचा धोका असून संपूर्ण परिसरात धूराचे मोठ मोठे लोट उठताना दिसत आहेत. नदी काठाला लागून असलेल्या या गल्लीपर्यंत पोहचण्यात अग्निशामक दलाला मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत़. स्थानिक तरुणांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व ही आग शेजारी झोपड्यांमध्ये पसरु नये, यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत.

या आगीच्या ठिकाणी जाण्यासाठी अग्निशामन दलाच्या वाहनांना जागा मिळावी, यासाठी परिसरातील वाहतूक रोखण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे १५ कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी गर्दी रोखण्याचे काम करीत आहेत. सोमवारी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास पाटील इस्टेट झोपडपट्टीमधील गल्ली नंबर ५ मधील एका झोपडपट्टीला आग लागली होती. छोट्या गल्ल्यांमुळे अग्निशामक दलाची गाडी आत जाऊ शकत नव्हती. आजही हीच परिस्थिती उद्भवली असून बघ्याच्या गर्दीमुळे अग्निशामक दलाच्या गाड्यांना पुढे जाण्यासाठी जागा मिळणे अवघड होत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘दोन डोस घेतलेल्यांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा देण्याची शक्यता’, अस्लम शेख यांची माहिती!

News Desk

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची निवड ?

News Desk

“हे सगळं शरद पवारांचं नाटक”, किरिट सोमय्या संतापले

News Desk
राजकारण

#RamMandir : विधानसभेच्या आचारसंहितेमुळे राम मंदिरासाठी कायदा करण्यास अडचण !

News Desk

नवी दिल्ली | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी राम मंदिरावरून सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठावर जोरदार टीका केली आहे. ‘राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारचा कायदा आणण्याचा विचार आहे. मात्र, विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अडचण होत आहे’ असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आणि न्यायाधीशांनी काहीही केले असून न्यायालय या प्रकरणी गंभीर नाही. मंगळवारी (२७ नोव्हेंबर) पंजाब विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जोशी फाऊंडेशनच्या वतीने ‘राम जन्मभूमीवर अन्याय का?’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या सदस्यांनी न्याय नाकारल्याने आमच्या वेदना वाढत आहेत. ‘जर तुम्ही न्याय द्यायला तयार नसाल तर न्यायाधीश पदावर आपण रहावं की राजीनामा द्यावा याचा विचार त्यांनी करायला हवा’, अशा शब्दांत अयोध्या प्रकरणी सुनावणीसाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय खंडपीठावर टीका केली आहे. देश इतका अपंग झालाय का? की, दोन-तीन न्यायाधीश देशातील लोकांचा विश्वास, लोकशाही, संविधान आणि मूलभूत अधिकारांना थांबवू शकतात.’ असेही इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे.

Related posts

मला आजही पंतप्रधान मोदींची जात माहित नाही !

News Desk

फडणवीस सरकारचा कहर, दुष्काळाची पाहणी टॉर्चच्या प्रकाशात

swarit

मोदी सरकारला लष्कराच्या इतिहासाबाबत माहिती नाही !

News Desk