HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्याच्या पाटील इस्टेट झोपडपट्टीला भीषण आग

पुणे | मुंबई रोडवरील पाटील इस्टेट झोपडपट्टीला आज (२८ नोव्हेंबर) दुपारी भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या १० गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत चार झोपड या आगीच्या विळख्यात जळून खाक झाल्या आहेत. या आगीत ६ ते ७ गॅस सिलेंडरचे स्फोट झाल्याने आगीचा आणखी भडका उडाला असून गर्दीमुळे अग्निशामक दलाच्या जवानांना काम करणे अवघड होत आहे.

पाटील इस्टेट झोपडपट्टीतील गल्ली नंबर ३ मधील एका झोपडपट्टीला दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली होती. आग मोठ्या प्रमाणावर पसरण्याचा धोका असून संपूर्ण परिसरात धूराचे मोठ मोठे लोट उठताना दिसत आहेत. नदी काठाला लागून असलेल्या या गल्लीपर्यंत पोहचण्यात अग्निशामक दलाला मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत़. स्थानिक तरुणांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व ही आग शेजारी झोपड्यांमध्ये पसरु नये, यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत.

या आगीच्या ठिकाणी जाण्यासाठी अग्निशामन दलाच्या वाहनांना जागा मिळावी, यासाठी परिसरातील वाहतूक रोखण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे १५ कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी गर्दी रोखण्याचे काम करीत आहेत. सोमवारी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास पाटील इस्टेट झोपडपट्टीमधील गल्ली नंबर ५ मधील एका झोपडपट्टीला आग लागली होती. छोट्या गल्ल्यांमुळे अग्निशामक दलाची गाडी आत जाऊ शकत नव्हती. आजही हीच परिस्थिती उद्भवली असून बघ्याच्या गर्दीमुळे अग्निशामक दलाच्या गाड्यांना पुढे जाण्यासाठी जागा मिळणे अवघड होत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपाच्या कार्यकारिणीत अजित पवारांच्या चौकशीच्या ठरावावरुन संजय राऊत संतापले, म्हणाले…

News Desk

सुशांतच्या प्रकरणांमूळे महाराष्ट्र सरकार अस्थिर होऊ लागली तर आधीच केंद्रातील सरकार पडेल – संजय राऊत

News Desk

‘‘मुख्यमंत्री, आमचाच बरं का! तसे दोघांत ठरले आहे!’’

News Desk
मनोरंजन

प्रदर्शनाच्या आधीच ‘2.0’ वादाच्या भोवऱ्यात

News Desk

मुंबई | सुपरस्टार रजनीकांत व अक्षय कुमार यांचा ‘2.0’ हा चित्रपट उद्या (२९ नोव्हेंबर) प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्याआधीच दूरसंचार कंपन्यांनी सेन्सॉर बोर्डाकडे धाव घेतली आहे. ‘मोबाइल टॉवर आणि फोनची बदनामी होईल, अशी काही दृश्ये चित्रपटात चित्रित करण्यात आली आहेत. त्यामुळे जनसुमदायामध्ये याबाबत चुकीचा संदेश जाऊन त्याचा नकारात्मक परिणाम दूरसंचार क्षेत्रावर होऊ शकतो’, असा आक्षेप सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडियाने केला.

या चित्रपटाचा आत्तापर्यंत रिलीज झालेला टीजर, ट्रेलर व अन्य व्हिडिओ पाहून सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडियाने या ‘2.0’ च्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या चित्रपटाला मिळालेले प्रमाणपत्र मागे घ्यावे, अशी याचिका सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडिया या संघटनेने सेन्सॉर बोर्डाकडे दाखल केली आहे.

‘2.0’ हा चित्रपट २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट भारतातील आत्तापर्यंतचा सर्वाधिक महागडा चित्रपट आहे. हा चित्रपट बनविण्यासाठी ५०० कोटींहूनही जास्त खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे आता सेन्सॉर बोर्ड याबाबत कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडिया एक अशासकीय संस्था आहे. एअरटेल, व्होडाफोन, रिलायन्स जिओ यासारख्या टेलिकॉम कंपन्या या असोसिएशनच्या सदस्य आहेत.

Related posts

सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांना व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर

swarit

प्रियंका चोप्रा-निक जोनस यांचा जुलै-ऑगस्टमध्ये साखरपुडा

News Desk

शाहरुखचा झिरो मोठ्या साईजमध्ये रिलीज

News Desk