HW News Marathi
राजकारण

मध्य प्रदेशात मतदानादरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड, काँग्रेस नेत्यांकडून तक्रार

नवी दिल्ली | मध्य प्रदेश व मिझोराम या राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरु असताना राज्यात जवळपास ७० हूनही अधिक ठिकाणच्या ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची शंका काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली आहे.

राज्यात ७० पेक्षाही जास्त ठिकाणच्या ईव्हीएम मशीन्समध्ये बिघाड झाला असल्याची तक्रार करण्यात आली असून या मशीन्स तात्काळ बदलण्यात आल्याचे राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, ज्या मशीन्स बिघाड झाल्याने बदलण्यात आल्या आहेत त्यांच्या नंबरची नोंद ठेवणे आवश्यक आहे, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या २३० जागांसाठी मतदान होत आहे. दोन्ही राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.एकूण ५,०४,९५,२५१ मतदार मतदान करणार आहेत. सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३२ टक्के एवढे मतदान झाल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा केंद्रशासित करा”, उद्धव ठाकरेंची मागणी

Aprna

राम मंदिर अयोध्येत नाही तर काय मक्का मदिनेत होणार ?

News Desk

एकनाथ शिंदेंनी केली सुनील प्रभू यांची विधीमंडळ मुख्य प्रतोद पदावरून उचलबांगडी

Aprna
मुंबई

भिंडेना आठ दिवसांत अटक करा, नाही तर विधान भवनाला घेरा घालू

News Desk

मुंबई | भिमा-कोरेगाव प्रकरणी मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसात अटक करा, नाही तर विधान भवनाला घेराव घालू असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिले आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आझाद मैदानातील ‘एल्गार मोर्चा’त प्रकाश आंबेडकर बोलत होते.

भिमा-कोरेगाव प्रकरणाला तीन महिने पूर्ण झाले असून सुद्धा मुख्य आरोपी संभाजी भिडे अद्यापही मोकाट फिरत आहे. त्यामुळे हा एल्गार मोर्चा काढण्यात आला. सरकार संभाजी भिंडे याला जावयासारखी वागणूक का देत आहेत असा सवाल आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला. या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांना पोलिसांनी अटक केले आहे.

Related posts

नगरसेवकांचे ‘प्रजा फाऊंडेशन’कडून प्रगतिपुस्तक जाहीर

News Desk

हिंदुजा महाविद्यालयाला अवैध पार्किंगचा विळखा, वाहतुक पोलिस शाखा बघ्याच्या भुमिकेत

News Desk

मुंबईत १००० मुला-मुलींसाठी वसतीगृह सुरू करण्याची मागणी

swarit