HW News Marathi
महाराष्ट्र

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी !

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लहान मुलांनाही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील १ली ते ८वी विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाणार आहे. या विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची महत्त्वाची घोषणा केली आहे.

वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणाल्या?राज्यात कोरोनाची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. पहिली ते आठवी वार्षिक मूल्यमापन याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन, युट्यूब, गुगल यामाध्यमातून आपण शिक्षण सुरु ठेवलं. खरतर पहिली ते चौथीच्या शाळा सुरु झाल्या नाहीत. तर पाचवी ते आठवी या शाळा सुरु झाल्या. पण काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या त्या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाले नाही. पण विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावे असा प्रयत्न होता, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

सध्या कोरोनाची स्थिती पाहता १ली ते ८वीचे विद्यार्थ्यांचे वर्षभराचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. त्यात या विद्यार्थ्याने कशाप्रकारे अभ्यास केला हे बघितले पाहिजे. पण आताची परिस्थिती बघता हे यावर्षी होण शक्य नाही. राज्यातील जे पहिली ते आठवीचे जे विद्यार्थी आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लम्पी आजाराबाबत सूक्ष्म नियोजन करून रुग्णसंख्या कमी करा; राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना

Aprna

शिवसेना मोठी होण्यात माझा मोठा वाटा आहे!

News Desk

#COVID19 : राज्यातील कोरोनाबाधिताची संख्या ६९० वर, ५६ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज

News Desk