HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात बारावीचा निकाल ९०.६६% लागला, तर यावर्षी देखील मुलींनी मारली बाजी !

मुंबई | कोरोनामुळे प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल आज (१६ जुलै) जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षा निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवर पाहता येणार आहे.

राज्याचा यंदाचा निकाल ९०.६६% लागला आहे. यावेळचा निकाल हा ४.७८ टक्क्यांनी वाढला आहे. याहीवर्षी मुलींनीच बाजी मारलेली दिसली आहे. मुलींचा निकाल ९३.८८% लागला आहे. तर, मुलांचा निकाल ८८.०४ © इतका लागला आहे. राज्यात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९५.८९ % लागला आहे. तर, सर्वात कमी औरंगाबाद विभागाचा निकाल लागला आहे. औरंगाबाद विभागाचा ८८.१८% लागला आहे.

– कला शाखा निकाल : ८२.६३ टक्के

– वाणिज्य शाखा निकाल : ९१.२७ टक्के

– विज्ञान शाखा निकाल : ९६.९३ टक्के

– MCVC : ९५.०७ टक्के

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदगावच्या सेना आमदाराची भुजबळांशी खडाजंगी, त्यानंतर शिवसेनेची येवला मतदारसंघावर भगवा फडकवण्याची घोषणा!

News Desk

अनिल देशमुखांवरील ईडीच्या कारवाईवर सुप्रिया सुळे भडकल्या म्हणाल्या….

News Desk

३ तारखेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरविले नाही तर…!

Aprna