HW News Marathi
महाराष्ट्र

गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्याने नकारात्मकता दूर होते !

मुंबई। “गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्याने नकारात्मकता दूर होते,” असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला आहे,” असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “गायीचे दर्शन घेऊन तिच्या पाठीवरुन हात फिरवल्यास आपल्या शरीरातील नकारात्मकता दूर होते. हा चमत्कार आहे.” आमदारमतीच्या तिवसा तालुक्यातील एका गायीच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी (१२ जानेवारी) आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “व्यक्तिमत्त्व विकासाचे अनेक अभ्यासक घेतले जातात. त्यात मोठमोठे लोक प्रशिक्षण घेतात. पण यामुळे आपण संस्कृती विसरतो. आपल्यातील नकारात्मक विचार गायीच्या दर्शनामुळे, गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्यामुळे जातात हे आपण विसरुन जातो. आमची संस्कृती सांगते की, जर आपण गाईला स्पर्श केला तर सर्वच नकारात्मकता दूर होते.”

गेल्या काही दिवसांपूर्वीही त्यांनी अशाच प्रकारे एक वादग्रस्त वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केले होते. “जे आपल्याविरोधात आहेत, त्यांचे खिसे भरलेले आहेत. त्यांचे खिसे खाली करण्यासाठी ते येत असतात. आपले काही सरकार नव्हते आणि आता फक्त शपथच घेतलेली आहे. अजून खिसे गरम व्हायचे आहेत,” असे विधान यशोमती ठाकूर यांनी येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात केले होते. त्यावरून यशोमती ठाकूर यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सागरी जैवविविधता जपणुकीत कांदळवन प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद! – मुख्यमंत्री ठाकरे

News Desk

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधान झालेलेही पाहायला आवडेल !

News Desk

राऊतांनी फुकटचा सल्ला उध्दव ठाकरेंना द्यावा त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती येईल!

News Desk