HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादींच्या याचिकेवर आज होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार काल (२३ नोव्हेंबर) यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) रात्री बारा वाजता राष्ट्रपती राजवट संपुष्टात आली. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज (२४ नोव्हेंबर) सकाळी ११.३० वाजता सुनावणी होणार आहे.

विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तत्काळ घेऊन बहुमत सिद्ध करण्याचे आदेश नव्या सरकारला द्यावेत अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच राज्यपालांचा हा निर्णय बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. या याचिकेमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाबरोबर महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

भाजपने १४५ आमदारांचे बहुमत असून आम्ही सत्तास्थापनेसाठी दावा दाखल करण्याच्या तयारीत होतो. तरीही राज्यपालांनी मनमानी पद्धतीने फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी बोलवले आणि शपथही दिली असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. राज्यपालांच्या या मनमानीविरोधात घटनेच्या कलम ३२नुसार ही याचिका करावी लागत असल्याचेही त्यात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वैद्यकीय प्रवेशावरून नाराज मराठा विद्यार्थ्यांना चर्चेतून तोडगा काढण्याचे आश्वासन

News Desk

फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय!

News Desk

बॉलिवुड ड्रग्स प्रकरण : अभिनेत्री दीपिका पादुकोण एनसीबी कार्यालयात दाखल 

News Desk