HW News Marathi
Covid-19

राज्यात सलग तिसऱ्यांदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, आज ५,४९३ रुग्णांची पडली भर

मुंबई | राज्यात आज कोरोनाच्या ५ हजार ४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज (२८ जून) सलग तिसऱ्या दिवसशी कोरोना रुग्णांची संख्याही पाच हजारहून अधिक झाली आहे. तर राज्यात करोनामुळे १६७ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. यामुळे आता राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ६४ हजार ६२६ वर पोहोचली आहे. असून सध्या राज्यात ७० हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज २३३० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ८६ हजार ५७५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.५९ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख २३ हजार ५०२ नमुन्यांपैकी १ लाख ६४ हजार ६२६ नमुने पॉझिटिव्ह (१७.८२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७० हजार ४७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ६० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ९६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५१ टक्के एवढा आहे. मागील ४८ तासात झालेले ६० मृत्यू हे मुंबई मनपा-२३, ठाणे मनपा-२,नाशिक-३, नाशिक मनपा-५, पुणे मनपा-२०, सोलापूर मनपा-४, सांगली-१, रत्नागिरी-१. या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धारावी कोरोना मॉडेलचं जगभरात कौतुक, फिलिपिन्समध्ये धारावी मॉडेल राबवणार

News Desk

चिंताजनक! देशात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात

News Desk

मोठा दिलासा! देशात २४ तासांत ४६ हजार १४८ कोरोना रुग्ण

News Desk