HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपशिवाय सरकार स्थापन होऊच शकत नाही !

मुंबई | राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होणार आणि ५ वर्षे टिकेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. पाटील पुढे म्हणाले की, अपक्षांसह भाजपकडे ११९ संख्यांचे पाठबळ असून भाजपशिवाय सरकार स्थापन होऊच शकत नाही, अस दावा पाटलांना आज (१५ नोव्हेंबर) पत्रकारांशी बोलताना केला आहे. कडबोळे सरकार राज्याचे भले करणार नाही, असे म्हणत पाटलांनी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेवर तोफ डागली. तसेच राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापन केल्यास सहा महिने देखील त्यांचे सरकार टिकणार नाही, असे पाटलांनी सांगितले.

तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून शंभरचा आकडा देखील पार करू शकणार नाही, असा आत्मविश्वास पाटलांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. भाजपशिवाय सत्ता स्थापन करणे अशक्य, असल्याचा दावा देखील पाटलांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. तसेच भाजपला विधानसभा निवडणुकीत १ कोटी ४२ लाख मते मिळाली आहेत तर शिवसेनाला ९० लाख मते मिळाल्याचा दावा देखील यावेळी त्यांनी केला आहे. काल (१४ नोव्हेंबर) राफेल संबंधी सुप्रीम कोर्टाने दिला. राहुल गांधींनी देशाची दिशाभूल केली. यासाठी राहुल गांधींनी देशाची माफी मागायला हवी, यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत, असे पाटील म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अजूनही चिपळूणकर मदतीच्या प्रतीक्षेत’, उदय सामंत म्हणतात मंगळवारी 5 हजार रुपये जमा होणार!

News Desk

“मंत्र्यांवर गुन्हे दाखल का करत नाही?”, इम्तियाज जलीलांनी उठवला सवाल

News Desk

राज्यपाल-उद्धव ठाकरे ,अजित पवार भेटीत नेमकं काय घडलं ? १२ आमदारांबद्दल राज्यपाल काय म्हणाले ?

News Desk