HW News Marathi
महाराष्ट्र

‘पीक विम्याबाबत राज्य सरकारची, केंद्राला विनंती’, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या शरद पवार!

मुंबई। पंतप्रधान पीक विम्याबाबत एका आठवड्याची मुदत वाढवा, अशी विनंती राज्य सरकारकडून केंद्र सरकारला करण्यात आली आहे. अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. तर सह्याद्री अतिथीगृहावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दादा भुसे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. पवारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत शेतकरी प्रश्नावर चर्चा झाली. त्यात पवारांनी महत्वाच्या सूचना दिल्याची माहिती भुसे यांनी दिलीय.

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या, अशी सूचना शरद पवार यांनी दिल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं. तसंच फलोत्पादकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. निर्यातदार यांच्याही तक्रारी होत्या, असं दादा भुसे यांनी म्हटलंय. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाच्या काळात उत्तम काम केलं आहे. एका वडिलांप्रमाणे त्यांनी भूमिका निभावली आहे. त्यामुळेच ते लोकप्रीय मुख्यमंत्री ठरल्याचं दादा भुसे यांनी म्हटलंय. तसंच आमच्याकडे संख्याबळ आहे. त्यामुळे मतदान गुप्त किंवा आवाजी असलं तरी आम्ही घाबरत नाही, असा निशाणा देखील दादा भुसे यांनी फडणवीस यांना लगावला.

शरद पवारांच्या सूचना- 

बैठकीत मार्गदर्शन करताना खासदार शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात फलोत्पादनवाढीला व फळनिर्यातीला प्रचंड संधी आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात एक स्वतंत्र फळपिक जिल्ह्याचं वैशिष्ट्यं म्हणून विकसित करता येईल. फलोत्पादन व उत्पन्न वाढीसाठी जागतिक स्तरावरील उत्कृष्ट वाण शेतकऱ्यांना उपलब्ध झाले पाहिजेत. यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी. फळांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, ब्रॅन्डिंग निर्माण करण्यासाठी, फळप्रक्रिया उद्योग उभारण्यास शासनाने मदत करावी. फळनिर्यातदारांची फसवणूक टाळण्यासाठी यंत्रणा कार्यक्षम करावी, आदी सूचनाही खासदार शरद पवार यांनी केल्या आहेत.

‘महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र –

वस्तुस्थिती, संधी आणि दिशा’ या विषयावर सह्याद्री अतिथिगृहात, खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला कृषीमंत्री दादाजी भुसे, फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार, पोक्राच्या प्रकल्प संचालक इंद्रा मालो. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्सचे विलास शिंदे आदींसह राज्यातील फलोत्पादन, कृषी निर्यात क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत खैरे-अब्दुल्ल सत्तार यांच्यातील वाद संपला, सर्व गैरसमज दूर झालेत !

News Desk

विधानपरिषदेत राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सादर केला अर्थसंकल्प

Aprna

मनसे नगरसेवकाने फोडली पुणे महापालिकेच्या उपायुक्तांची गाडी

News Desk