HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यातील जिल्ह्यांत काय सुरू राहणार? जाणून घ्या…

मुंबई | राज्यात कोरोनामुळं घालण्यात आलेल्या निर्बंधांवर आता हळूहळू शिथिलता येत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होतील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे आहेत.

या जिल्ह्यातून लॉकडाऊन मागे घेण्यात आला आहेत. या नियमांची अंमलबजावणी उद्या पासून सुरू राहणार आहे. ही अंमलबजावणी त्या जिल्ह्यातील ते जिल्हाधिकारी करतील. दर शुक्रवारी आढावा घेतला जाईल, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांत काय सुरू होणार?

– रेस्टॉरंट, मॉल्स

– गार्डन, वॉकिंग, ट्रेक सुरू होतील

– खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील

-चित्रपट शूटिंगला परवानगी

-थिएटर सुरू होणार

-सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळ्याला 100 टक्के सुट

-ई कॉमर्स सुरू राहिल

-जिम, सलून सुरू राहणार

-जमावबंदी राहणार नाही

-बस 100 टक्के क्षमतेने

-आंतरजिल्हा प्रवास मुभा

-इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध लागू असणार ते जाहीर केले जातील

दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांत काय सुरू होणार?

-50 टक्के क्षमतेने रेस्टॉरंट सुरू

-सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील

-बांधकाम पूर्ण सुरू, कृषी कामे सुरू

-ई सेवा पूर्ण

-जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर 50 टक्के सुरू

-बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने

-जिल्ह्याच्या बाहेर प्रायव्हेट कार, बसेस, ट्रेन, खाजगी गाड्या,टॅक्सी यांना परवानगी आहे मात्र पाचव्या लेव्हलला जाण्यासाठी ई पास लागेल

तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांत काय सुरू होणार?

– अत्यावश्यक आणि इतर दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत सुरु राहणार(सोमवार ते शुक्रवार )

– अत्यावश्यक दुकाने शनिवार रविवार सुरू राहणार इतर दुकाने बंद राहणार

पहिल्या टप्प्यातील जिल्हे

ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ ( संपूर्ण अनलॉक)

दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे

अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदूरबार ( अंशतः निर्बंध शिथिल)

तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे

अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर ( अंशतः निर्बंध शिथिल)

चौथ्या टप्प्यातील जिल्हे

पुणे, रायगड ( अंशतः निर्बंध शिथिल)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होणार, लॉकडाऊनबद्दल काय निर्णय होणार?

News Desk

मुंबईसाठी आनंदाची बातमी …..

News Desk

कोरोनाचा उद्रेक! पवारांच्या बारामतीत ७ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन

News Desk