HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला दिला कौल;राष्ट्रवादी होणार एक नंबरचा पक्ष – महेश तपासे

मुंबई | आज जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला कौल दिला असून राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष असेल याचे चित्र आकडेवारी आल्यानंतर स्पष्ट होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

आज राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुका पक्षचिन्हावर होत नसल्या तरी महाविकास आघाडी सरकारच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कामांवर जनता समाधानी आहे हे चित्र स्पष्ट झाले आहे.

राज्यात महाविकास आघाडीने भाजपाला जोरदार धक्के देत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूका जाहीर झाल्या आणि यामध्ये आघाडी सरकारच्या कामावर जनतेने समाधान व्यक्त करत विजयाचा कौल दिला आहे.

त्याचबरोबर यामध्ये राष्ट्रवादीला एक नंबरचा पक्ष म्हणून पुढे आणले आहे असा दावाही महेश तपासे यांनी केला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आदरणीय शरद पवारसाहेबांच्या निर्णय क्षमतेवर जनतेचा विश्वास असल्यानेच हा कौल मिळाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण | संभाजीराजेंचा दौरा लांबला, २८ मे रोजी मांडणार भूमिका

News Desk

मांसविक्रीवर बंदी तर या व्यवसायातील लोकांना आदित्यनाथांकडून दूधविक्रीचा सल्ला!

News Desk

डॉ. आंबेडकराचे परळमधील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित

News Desk