HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या ट्विटवर माणिकराव ठाकरेंनी दिली ही प्रतिक्रिया 

यवतमाळ | काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन सुरु असलेल्या अंतर्गत धुसफूसवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाचं अध्यक्ष व्हावे ही सगळ्यांची इच्छा आहे. मात्र काही नेत्यांनी अशा प्रकारचा पत्र व्यवहार करायला नको होता,” असे माणिकराव ठाकरे म्हणाले.

काँग्रेस नेते सुनील केदार यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे ट्विट केलं. महाविकासआघाडीत काहीही नाराजी नाही. एखादा आमदार विकास काम करुन जर आंदोलनाची भूमिका घेत असेल तर त्याबाबत काळजी घेतली पाहिजे अशी वेळ येऊ नये, असेही माणिकराव ठाकरे म्हणाले.

गांधी कुटुंबियांवर प्रश्न उपस्थित करणार्‍यांना पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी या कृत्याबद्दल तात्काळ माफी मागावी. माफी मागितली नाही तर हे तीन नेते राज्यात कसे फिरतात ते काँग्रेसचे कार्यकर्ते बघून घेतील. गांधी घराण्याचे नेतृत्व असेल तरच काँग्रेस भाजपला टक्कर देऊ शकतो. सोनिया गांधी यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे, असे ट्विट सुनिल केदार यांनी केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आठवलेंच्या पक्षाचा एकही आमदार व खासदार नाही, शरद पवारांनी घेतला आठवलेंचा समाचार

News Desk

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला आजपासून सुरुवात

swarit

वरुण सरदेसाईंच्या सुरक्षेवरुन भाजप-मनसेचा ठाकरे सरकारला टोला

News Desk