HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला आजपासून सुरुवात

मुंबई | काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंपघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे. ही जनसंघर्ष यात्रा जळगावच्या फैजपूरपासून सुरू होणार आहे. ही जनसंघर्ष यात्रा मोदी सरकारच्या महागाई, इंधन दरवाढ आणि पिकाला हामीभाव मिळत नाही, अशा विविध मुद्द्यांवरून काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा काढून मोदी सरकारला विरोधात एल्गार पुकारले आहे.

या दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसेचे नेते जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांमधील सर्वसामान्यांपर्यंत पोहचून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. २०१९च्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसने जनसंघर्ष यात्राचे पुकारली आहे. ४ ते ९ ऑक्टोबर दरम्यान फैजपूर ते अहमदनगर अशी ही यात्रा काढण्यात येणार आहे. या जनसंघर्ष यात्रेस काँग्रेसचे प्रदेसाध्यक्ष अशोक चव्हाण, मल्लिकार्जुन खर्गे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काँग्रेसचे राज्यातील सर्व नेते, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी सहभागी होतील.

५ ऑक्टोबर रोजी जळगाव ते धुळ्यात यात्रा काढण्यात येईल, ६ ऑक्टोबर रोजी नंदुरबार, नाशिक व धुळे जिल्ह्यात तर ७ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्ह्यात यात्रा काढण्यात येणार आहे. तसेच ९ ऑक्टोबर रोजी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात या यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे. जनसंघर्ष यात्रेचा पहिला टप्पा ३१ ऑगस्टला कोल्हापूरमधून सुरू झाली होती. तेव्हा कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यातून ही जनसंघर्ष यात्रा निघाली होती. पश्चिम महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्याची समारोप सभा पुण्यात झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाणांची केंद्राकडे महत्वाची मागणी!

News Desk

‘ते नवीन उगवलेलं गवत आहेत’, विजय वडेट्टीवारांची गोपीचंद पडळकरांवर टीका

News Desk

महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळला, एसटी सेवा केली बंद

News Desk