HW News Marathi
Covid-19

सरकारी मुर्दाडपणामुळे अनेक निष्पापांनी जीव गमवाला !, दरेकरांची बोचरी टीका  

मुंबई | “सुसाईड डेस्टिनेशनची फुशारकी मारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय!”, अशी अत्यंत बोचरी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. राज्यात नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असतानाच आता विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, आता राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ठाकरे सरकारवर हा निशाणा साधला आहे.
प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये प्रवीण दरेकर म्हणतात की, “राज्य सरकार आता तरी जागे व्हा!! नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असतानाचं विरारमध्ये व्यवस्थेतील निष्काळजीपणा दिसून आला. याला संपूर्णपणे ठाकरे सरकार ‘जबाबदार’ आहे. कोरोनापेक्षा सरकारी मुर्दाडपणामुळे अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील रुग्णालय आग प्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे. भंडारा, भांडूप, नागपूर आणि आता विरार कोविड रुग्णालयांना आगी लागल्या, नाशिकला ऑक्सिजन गळती झाली”, अशी घणाघाती टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

नवाब मालिकांचा टोला

“काही लोक येड्यासारखे बोलत आहेत. प्रवीण दरेकर जॅकेट घालून आरसा पाहून टीव्हीसमोर येतात. मी कसा दिसतो असं कॅमेरामनला विचारतात. याला सरकारला घेरणं म्हणत नाहीत”, अशी बोचरी टीका राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच, “राज्यात फायर ऑडिट केल्याशिवाय कोणत्याही रुग्णालयाला परवानगी देण्यात येत नाही. खासगी रुग्णालयात कधी कधी एसीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागते. अशावेळी सरकारला जबाबदार धरणं योग्य नाही. सरकारला कोणी घेरण्याचा प्रश्नच आहे”, असेही नवाब मलिक म्हणाले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा, रुपाली चाकणकरांनी केंद्राला डिवचलं

News Desk

CBSE कडून बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सुप्रीम कोर्टात सादर

News Desk

पुढील काळातील लॉकडाऊनमधली आव्हाने, अर्थचक्र गतिमान करणे यावर मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

News Desk