HW News Marathi
महाराष्ट्र

आत्महत्या करणारे 26 % शेतकरी मराठा समाजाचे

मुंबई – एप्रिल 2014 ते मार्च 2016 या कालावधीत मराठवाडा आणि विदर्भात एकूण 3880 शेतक-यांनी आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे यापैकी तब्बल 26 टक्के शेतकरी मराठा समाजाचे होते, अशी खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. एकट्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मराठा समाजाचे प्रमाण 53 टक्के आहे. पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅण्ड इकॉनॉमिक्स यांनी केलेल्या संशोधनातून ही माहिती निष्पन्न झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण 13 जिल्ह्यांमध्ये जाऊन याबाबत माहिती गोळा करण्यात आली. त्याच्याआधारे ही आकडेवारी मिळाली. स्वयंसेवकांनी आत्महत्याग्रस्त तीन हजार शेतकरी कुटुंबांना भेट दिली. दोन जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मराठा समाज शेतकरी आत्महत्यांमध्ये पहिल्या स्थानावर असल्याचं निदर्शनास आलं आहे. यानंतर अनुक्रमे कुणबी (16 टक्के), दलित (10 टक्के) आणि बंजारा (9 टक्के) समाजातील शेतकरी असल्याची माहिती सरकारी अधिका-याने दिली आहे. आत्महत्या करणा-या शेतक-यांपैकी फक्त पाच टक्के शेतकरी भूमिहीन होते, असेही समोर आले आहे. दरम्यान, मराठवाड्यात जी समस्या मराठा समाजातील शेतक-यांना सतावत आहे, तीच विदर्भात कुणबी समाजाला सतावत आहे. येथे आत्महत्या करणा-यांपैकी 30 टक्के शेतकरी कुणबी समाजाचे असून फक्त दोन टक्के मराठा होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मनपा निवडणुक मनसेसाठी प्रतिष्ठेची

News Desk

सरकार पाडून दाखवा? अहो जराशीपण लाज असेल तर सरकार चालवून दाखवा ना!

News Desk

आज कोल्हापुरात वाहतुकीसाठी ‘कोणते’ मार्ग सुरू होणार

News Desk
मुंबई

निकाल लागला पण विद्यार्थ्यांनी नाही पाहिला

News Desk

मुंबई : धडपडत, चाचपडत रविवारी रात्री उशिरा मुंबई विद्यापीठाने एकदाचा टीवाय बीकॉमचा निकाल जाहीरकेला खरा, पण अद्यापही तो विद्यार्थ्यांना काही पाहाता आलेला नाही. संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणींचे कारण यासाठी देण्यात येत असले, तरीही त्याने त्रस्त विद्यार्थ्यांचे काही समाधान झालेले नाही. त्यामुळे सोमवारी अनेकविद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे धाव घेतली होती. मुंबई विद्यापीठाने मार्च-एप्रिलदरम्यान, पदवी अभ्यासक्रमाच्या घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनलाइन सुरू आहे. ऑगस्ट महिना उजाडूनही ४० हून अधिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेलेनाहीत. काही निकाल तांत्रिक अडचणींमुळे राखीव ठेवले आहेत. मात्र येत्या १० दिवसांत विद्यार्थ्यांना निकाल देण्यात येतील, असे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे.

Related posts

अजय देवगण घेऊन येणार भारतीय जवानांच्या गलवान खोऱ्यातील शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर

News Desk

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगला देण्यास विरोध

News Desk

नवी मुंबईत कुत्रे होतायत निळे!

News Desk