HW News Marathi
मुंबई

अजय देवगण घेऊन येणार भारतीय जवानांच्या गलवान खोऱ्यातील शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर

मुंबई | भारत चीन दरम्यान सुरू असलेल्या वादात सीमेवर २० जवानांनी प्राणाची आहुती दिली. तर या चकमकीत भारतीय जवानांनी चीनच्या ४० जवानांना ठार केले होते. आता गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. फिल्म क्रिटीक तरण आदर्श यांनी यासंदर्भातील माहिती ट्विरवरून दिली आहे.

“अजय देवगण गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीवर चित्रपट तयार करणार आहे. सध्या या चित्रपटाचे नाव निश्चित करण्यात आले नाही. या चित्रपटात चीनच्या लष्कराच्या सामना केलेल्या त्या २० जवानांची शौर्यगाथा दाखवली जाणार आहे. या चित्रपटाची स्टारकास्टही अजून अंतिम करण्यात आलेली नाही,” असे ट्विट तरण आदर्श यांनी केले आहे. अजय देवगण एएफ फिल्म्स आणि सिलेक्ट मीडिया होल्डिंग्स एलएलपी हे या चित्रपटाचे निर्माते असणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयकुमार रावल यांना न्यायालयात उत्तर देऊ | नवाब मलिक

swarit

उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक

swarit

“जे गेले त्यांच्याबद्दल… “; कीर्तिकारांच्या शिंदे गटाच्या प्रवेशावर पेडणेकरांची प्रतिक्रिया

Darrell Miranda