HW News Marathi
महाराष्ट्र

Maratha Reservation | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा पांडुरंगाचा आशीर्वाद !

मुंबई | “मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल म्हणजे पांडुरंगाने दिलेला आशीर्वादच आहे”, असे म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात दिलेल्या निकालाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिकांवर शुक्रवारी (१२ जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, यावेळी न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्यास नकार दिल्याने राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालायने मराठा आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्यास नकार दिला असला तरीही पुढच्या दोन आठवड्यात या प्रकरणी उत्तर देण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने २७ जून रोजी मराठा समाजाला दिले गेलेले आरक्षण हे वैधच आहे, असा निर्णय दिला आहे. तसेच उच्च न्यायालायने मराठा समाजाच्या आरक्षणाविरुद्धच्या सर्व याचिका देखील फेटाळून लावल्या. त्यामुळे या याचिकाकर्त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात आकडेवारीवरुन सेना-भाजपमध्ये आगपाखड

News Desk

पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश, आपत्कालीन मदत यंत्रणेचे मानले आभार

News Desk

रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगसाठी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का?, राष्ट्रवादीचा सवाल

News Desk