HW News Marathi
महाराष्ट्र

अमरावती शिवसेनेत वाद, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावली बैठक

मुंबई | शिवसेनेचे माजी खासदार अनंतराव गुढे यांनी गद्दारीमुळेच अमरावती लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव झाल्याची तक्रार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. अभिजीत अडसूळ यांनी ही तक्रार केली आहे. “अनंतराव गुढे यांच्या पत्नीने नवनीत कौर राणा यांच्या विजय आणि आभार रॅलीत सहभागी होत नवनीत राणा यांचा सत्कार केला होता. याचे सगळे व्हिडिओ आणि फोटो उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे या संपूर्ण पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रविवारी (१४ जुलै) मातोश्रीवर अमरावतीच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक बोलावली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’….. आणि अजित पवारांचा चढला पारा

News Desk

‘तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक’,फडणवीसांनी हात झटकले !

News Desk

“किरीट सोमय्या यांच्या बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त ठेवायला ते दहशतवादी आहेत का?”

News Desk
महाराष्ट्र

सत्ताधारी असूनही शिवसेना विरोधकांसारखी आंदोलनाची भाषा करते !

News Desk

मुंबई | शिवसेना बुधवारी (१७ जुलै) पिकविमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चा काढणार असल्याची घोषणा काहीच दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या शेतकऱ्यांसाठीच्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. “महाराष्ट्रात २०१४ सालापासून शिवसेना भाजपचे सरकार असूनही शिवसेनेला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयश आले आहे. सत्ताधारी असूनही विरोधी पक्षासारखी शिवसेनेला आंदोलने करण्याची भाषा करावी लागते. शेतकऱ्यांसाठी ही मोर्चा काढण्याची भाषा म्हणजे केवळ शिवसेनेची नौटंकी आहे”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

“शिवसेना येत्या १७ जुलैला शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहे. शेतकऱ्यांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असून मोर्चा शेतकऱ्यांंचा नव्हे तर शेतकऱ्यांंसाठी असणार आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे. “राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री काहीही बोलत नाही आणि बाहेर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याची भाषा करतात. सत्ताधारी पक्षाने लोकांच्या समस्या सोडविणे अपेक्षित असते. मात्र, शिवसेनेचे सरकारमध्ये काही चालत नाही”, अशी बोचरी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

Related posts

सातारा काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, पोटनिवडणूक लढविण्यास कोणी तयार नाही

News Desk

शरद पवारांच्या घरावर हल्ला हा सुनियोजित कटाचा भाग आहे! – महेश तपासे

News Desk

मोदी सरकराच्या इमेज बिल्डिंगवर अनुपम खेर यांचा थेट प्रहार! प्रतिमेपेक्षा लोकांचा जीव वाचवा…

News Desk