HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्राच्या कृषी कायद्याबाबत आज मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वाची बैठक होणार

मुंबई | राजधानी दिल्लीच्या वेशीवर कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेले १५ दिवसांच्या वर आंदोलन करत आहेत. अशातच राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीसुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी बाईकवरुन दिल्ली गाठली आहे. त्यानंतर बच्चू कडू यांनी तिथल्या आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी आज मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वाची बैठक होणार आहे. आज दुपारी दोन वाजता ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये अधिनियमांतील त्रुटी आणि उणिवांचा अभ्यास करण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळ उपसमितीची आज (१७ डिसेंबर) दुपारी २ वाजता मंत्रालयात बैठक पार पडणार आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांमधील त्रुटी आणि उणिवांबाबत मंत्रालयात आज विचार विनिमय केला जाणार आहे. त्रुटी आणि उणिवांबाबत अभ्यास करणाऱ्या उपसमितीसोबत मंत्रालयात खलबंत होणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि काही शेतकरी संघटनांमधील वाद मिटविण्यासाठी समिती स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी रस्ता मोकळा करण्याच्या याचिकेवर काल (गुरुवारी) सुनावणी झाली. हा देशव्यापी मुद्दा आहे. सरकारी संस्थांशी वाटाघाटी अयशस्वी ठरली. म्हणून आम्ही एक समिती स्थापन करू ज्यात सरकारसह आंदोलक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. तसेच देशातील त्या शेतकरी संघटनांचे लोक असावेत जे अद्याप आंदोलन करत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सॅम डिसुझा आणि मोहित कंबोजच ड्रग्ज प्रकरणाचे खरे मास्टरमाईंड | सुनील पाटील

swarit

पुण्यात एकही वर्तमानपत्र प्रसिद्ध होणार नाही

swarit

इंटरव्यूमध्ये इंटरेस्ट कोणाला नाही, खरं कौशल्य लढ्यामध्ये असतं बोलण्यामध्ये नाही – निलेश राणे

News Desk