HW News Marathi
महाराष्ट्र

लातूरमध्ये मेट्रो आणि लोकलच्या डबेनिर्मितीचा प्रकल्पाला मंजूरी

लातूर | मेट्रो आणि लोकल डबेनिर्मितीचा कारखाना उभारण्यास रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या प्रस्तावला मंजूरी दिली आहे. अर्थसंकल्प सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री गोयल यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या कारखान्यामुळे मराठवाड्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

लातूर व उस्मानाबाद जिल्हे दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखले जातात. तसेच पाण्या आभावी येथील शेतीचे उत्पन्न ही मोजकेच येते. त्यामुळे कृषीकडून उद्योगांकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने सरकारने उचलले हे महत्त्वाचे पाऊल आहे.

वर्षभरात साडेतीशे ते चारशे डब्यांची निर्मिती होऊ शकते. लोकल डब्यांची निर्मिती मेक इन इंडिया अंतर्गत होणार आहे. ‘लातूरला रेल्वे डब्यांच्या निर्मितीचा प्रकल्प मंजूर केल्यामुळे मराठवाड्यातील तरुणांना आर्थिक तसेच रोजगाराच्या दृष्टीने चालना मिळू शकते अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर अकाउंटवरुन रेल्वे मंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहे. ’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Poladpur Bus Accident: आंबेनळी घाटातून ३० मृतदेह बाहेर काढले, शोधकार्य थांबले

swarit

नगर जिल्हा बँकेत काहींनी गम्मत केली, ती कशी-कुणी केली हे मला माहीतय ! | अजित पवार

News Desk

गुढीपाडवा निमित्ताने धनंजय मुंडेनी घेतले प्रभु वैद्यनाथाची दर्शन

Aprna
राजकारण

राज्य सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा अंहकार

swarit

प्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातून व्हिआयपी कल्चर नष्ट व्हावे, यासाठी मंत्र्यांच्या वाहनांवरील लाल दिवे हटवण्याचे आदेश दिलेले आहे. यामागचा उद्देश उदात्त असला तरी राज्य सरकारमधील काही मंत्री अद्याप व्हिआयपी कल्परमधून बाहेर पडण्यास तयार नाहीत. आजही अनेकजण सत्तेच्या अंहकाराने ग्रासलेले आहेत. मंत्रालयात याचा वारंवार प्रत्यय येतो. मंगळवारी मंत्र्याच्या मस्तीचा अनुभव याची डोळा याची देही अनुभवता आला..

राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी मी व माझे सहकारी सुजीत नायर कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना भेटण्यासाठी मंत्रालयात गेलो होतो. दुपारी दोनची वेळ होती. शांत रांगेत उभा राहून रितसर परवानगी घेतली होती. रांगेत उभे राहून मंत्रालयात प्रवेश मिळवला. सहाव्या मजल्यावर जाणाऱ्या लिप्टमध्ये चढलो असता दुसऱ्या मजल्यावर अचानक लिफ्ट थांबवण्यात आले व लिफ्टमध्ये सर्व ज्येष्ठांना बळजबरीने बाहेर काढण्यात आले.

चला चला बाहेर चला, साहेब आले आहेत. काही कळण्याच्या आता सर्वांना बाहेर काढण्यात आले. त्याचवेळी मंत्री मोहदय विजय बापू शिवतरे आणि त्याच्यासोबत तीन चार लिफ्टमध्ये शिरले. हा प्रकार सुरू असताना त्यांना सर्वसामान्याविषयी थोडीही किव आली नाही. सॉरी , माफ करा , अर्जेट आहे, अश्या एका शब्दानेही मंत्री मोहदयांनी दिलगिरी व्यक्त केली नाही. याचीच खंत वाटते. मात्र मंत्र्यांच्या चेहऱ्यावर सत्तेची मस्ती आणि त्यातून आलेला अंहकार दिसून येत होता. अशा मस्तवाल्या मंत्र्याकडून सामन्य लोक काय अपेक्षा ठेवणार.. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Related posts

#MarathaReservation : मराठा आरक्षणावरून श्रेयवादाची लढाई ?

News Desk

“गिरीश महाजन सभागृहात का नाही आले?”, मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून अजित पवारांचा संतप्त सवाल

Aprna

अयोध्येनंतर ठाकरेंची पंढरीची वारी

News Desk