HW News Marathi
देश / विदेश

मेट्रो सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा केंद्राचा विचार

नवी दिल्ली | १ सप्टेंबरपासून मेट्रोची सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा केंद्राचा विचार सुरू आहे. १ सप्टेंबरपासून देशात सुरू असणाऱ्या अनलॉकचा पुढचा टप्पा सुरु होणार आहे. अनलॉक ४ साठी केंद्र सरकारच्या गाइडलाइन्स लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. त्यात आतापर्यंत बंद असलेल्या मेट्रो सेवेला काही प्रमाणात हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केंद्र सरकारकडे तशी मागणी केली होती.

कोरोना संसर्गामुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. आता टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत अनलॉकचे ३ टप्पे पूर्ण झाले आहे. ३१ ऑगस्टला अनलॉक ३ संपणार आहे. त्यामुळे १ सप्टेंबरपासून अनलॉक ४ सुरु होणार आहे. यानुसार अनेक बाबींमध्ये सुट मिळण्याची शक्यता आहे. यात मोठ्या शहरांमधील मेट्रो सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा केंद्राचा विचार असल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दोन्ही PA अटकेत, आता अनिल देशमुखांवरही टांगती तलवार

News Desk

महंत भास्करदास यांचे निधन

News Desk

विरोधी पक्षांनी कमांडर अभिनंदन प्रकरणी षडयंत्र रचले, पंतप्रधान मोदींचा आरोप

News Desk