HW News Marathi
Covid-19

उत्तर प्रदेशमध्ये जे घडलं ते धक्कादायक ! । जयंत पाटील

मुंबई । “उत्तर प्रदेश सरकारला कोरोनाचा सामना करण्यात अपयश आले आहे. म्हणूनच स्मशानभूमी कमी पडत असावी. काही समस्या असेल म्हणून मृतदेह नदीत सोडत असावेत. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये जे घडलं ते धक्कादायक आहे”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (१३ मे) आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी जयंत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“आता लसीकरण हाच समस्येवर उपाय आहे. दुसर्‍या लसीसाठी केंद्राकडून लस येणे अपेक्षित होते, मात्र ती लस येत नाहीय. २ लसीमधील अंतर वाढले तर फरक पडेल का ?याची शास्त्रीयदृष्टीने माहीती नाही”, असेही यावेळी जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

त्याचसोबत, “कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता लस निर्मितीचे कारखाने इथे उभे करायला पाहिजेत”, असे मतही जयंत पाटील यांनी बोलताना व्यक्त केले आहे.

काय आहे प्रकरण ?

उत्तर प्रदेशच्या उन्नवमधील एक धक्कादायक प्रकार समोर आहे. गंगा नदीच्या पात्रात असलेल्या वाळूत २ ठिकाणी काही मृतदेह दफन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. इथल्या स्थानिकांनी हे मृतदेह कोरोना रुग्णांचे असल्याची भीती व्यक्त केली आहे. तर याबाबतचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकाराबाबत असे सांगण्यात येते की, अंत्यसंस्कारासाठी लाकडं कमी पडल्याने काही हिंदू धर्मीयांनी पार्थिवांना अग्नी न देता ती दफन केली आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात सलग दुसऱ्या दिवशीही कोरोना रुग्ण संख्येत वाढ

News Desk

मुंबईत धारावी नाही तर ‘हा’ परिसर ठरतोय ‘कोरोना हॉटस्पॉट’

News Desk

अमेरिकेत कोरोनावर पहिली लसी, प्राथमिक चाचणीचा निकाल आशादायक, ‘मॉडर्ना’ कंपनीचा दावा

News Desk