HW News Marathi
Covid-19

“योग्य कोण, पंतप्रधान कि तुम्ही?”, जयंत पाटलांचा बोचरा सवाल

मुंबई । देशाप्रमाणेच राज्यातही सध्या आव्हानात्मक कोरोनास्थिती आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार ही स्थिती चांगल्या पद्धतीने हाताळत असल्याचे सांगत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. तर, दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित सरकारच्या कामावर ताशेरे ओढले आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे.

जयंत पाटील याबाबत एक ट्विट करत म्हणतात की, “देवेंद्र फडणवीसजी आजच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारने कोविडचा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल. आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, मा. पंतप्रधान कि तुम्ही?”, असा खोचक सवाल करत जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीसांची टीका काय ?

“कोरोना आकड्यांची बनवाबनवी तात्काळ थांबवा, असे म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. “मुंबईतील कोरोनामुळे मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे. त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे. हे प्रकार तत्काळ थांबवण्यात यावेत”, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना एक सविस्तर पत्रच लिहिले आहे.

पंतप्रधानांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या या कोरोना लढ्याचे कौतुक केले आहे. “महाराष्ट्र कोरोनाविरोधातील लढाई चांगली लढत आहे”, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात शनिवारी (८ मे) फोनद्वारे संभाषण झाले. याचवेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्राचे कौतुक केले आहे. इतकेच नव्हे तर यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधानांच्या सहकार्याबाबत त्यांचे आभार मानले आहे. “पंतप्रधान आणि केंद्र सरकार या कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होत आहे. महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्राने मान्यही केल्या आहे”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी केंद्राचे आभार मानले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जालन्यात पाच जण कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यात भीतीचे वातावरण

News Desk

न्यूझीलंडने अशी केली कोरोनावर यशस्वी मात

News Desk

पहिल्यांदा एका दिवसात तीन हजार ‘कोरोना’ रुग्ण, राज्याने ओलांडला ५० हजाराचा टप्पा

News Desk