HW News Marathi
महाराष्ट्र

हे फक्त पिता-पुत्र आणि पुतण्याभोवती फिरणारं सरकार! – आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर निशाणा  

मुंबई । राज्यातील महाविकासआघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे, हेच निमित्त साधून आता भाजपच्या नेत्यांकडून ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला जात आहे. आज (२८ नोव्हेंबर) भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर तोंडसुख घेतलं आहे. महाविकासआघाडीच्या द्विवर्षपूर्तीबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले की, “हे पिता, पुत्र आणि पुतण्याभोवती फिरणारं सरकार आहे. काही वर्षापूर्वीचे प्रसिद्ध नाटक ‘तीन पैशाचा तमाशा’ अशीच आजच्या महाराष्ट्राची परिस्थिती आहे”, अशा बोचऱ्या शब्दांत आशिष शेलारांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
महाविकासआघाडीवर घणाघाती टीका करताना आशिष शेलार म्हणाले की, “हे सरकार जनता केंद्रीत होण्यापेक्षा पिता, पुत्र आणि पुतण्या यांच्याच भोवती फिरत आहे. महाराष्ट्राची बदनामी हे ह्यांचंच पुत्र प्रेम आणि पब, पार्टी, पेग आणि पेंग्विन यामुळे झाली”, असा निशाणाही आशिष शेलार यांनी साधला आहे. “पुत्रप्रेमात काही चूक नाही पण त्यापोटी अनिल देशमुखांना गृहमंत्री बनवलं जातं आणि महाराष्ट्राची प्रतिमा देशात खराब होते”, असंही यावेळी आशिष शेलार म्हणाले. एकंदरच भाजपने आज सरकारविषयी मोठा संताप व्यक्त केला आहे.

आजचा दिवस खऱ्या अर्थाने वेदनांच्या प्रकटीकरणाचा!

“पुतण्याबद्दल काय सांगायचं. भितीने त्यांना वरच्या पदावर बसवलं जातं आणि मग एक हजार कोटींच्या वर बेनामी संपत्ती आढळते. अतर्क, असनदशीर आणि अहंकार अशीच या सरकारची कार्यपद्धती आहे हे स्पष्ट आहे” असं म्हणतानाच पुढे आशिष असंही म्हणाले की,
“आजचा दिवस खऱ्या अर्थाने वेदनांच्या प्रकटीकरणाचा दिवस आहे. जनतेला असंख्य वेदना भोगाव्या लागल्या आणि लागत आहेत. मात्र, सरकारला त्याचं काहीच देणंघेणं नाही.”
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंपाऊंडरला सतत चर्चेत राहायची भूक, संजय निरुपमांचा  राऊतांना अप्रत्यक्ष टोला

News Desk

परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्विकारण्याला 30 जून पर्यंत मुदतवाढ!

News Desk

“मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं का?”, अजित पवार म्हणतात..

News Desk