HW News Marathi
महाराष्ट्र

बॉलिवुडच्या मुद्द्यावर सेना – मनसेचे जुळले सुर

मुंबई | बॉलिवूडला संपवण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही सहन करणार नाही असे काल (१५ ऑक्टोबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले होते. दरम्यान, उत्तर प्रदेशच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये मोठी सिनेइंडस्ट्री तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यावरुन हा वाद सुरु झाला आहे. त्यावर आता मनसेने आपली भूमिका मांडली आहे.

बॉलिवूडमधल्या कलाकारांना भूतकाळातही गंभीर गुन्ह्यांखाली अटक झाली. त्यांना शिक्षा झाल्या पण म्हणून कुणी बॉलिवूडलाच खलनायक ठरवलं नाही. आता मात्र जाणीवपूर्वक बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. एवढंच नाही तर फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवण्याचं कुटील कारस्थान रचलं जातं आहे असा आरोप मनसेने केला आहे. मनसेचे चित्रपटसेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी याबाबत ट्विट करत भूमिका मांडली आहे.

या ट्विटमुळे कधी नव्हे तो मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सुरात सूर मिसळला आहे. कारण बॉलिवूडला इतरत्र हलवलं जाण्याचा कट आहे असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही केला होता.“भूतकाळातही बॉलिवूडमधील कलाकारांना गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली, त्यांना शिक्षा झाल्या, पण म्हणून कुणीही पूर्ण बॉलिवूडलाच खलनायक ठरवलं नाही. आता मात्र जाणीवपूर्वक बॉलिवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. एवढंच नाही, तर फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जात आहे” असा घणाघात अमेय खोपकरांनी केला.

“महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही असली कारस्थानं कधीही यशस्वी होऊ देणार नाही. तंत्रज्ञांपासून कलाकारांपर्यंत कुणीही घाबरायची गरज नाही, कारण राजसाहेबांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि यापुढेही राहणार, हा आमचा शब्द आहे” अशी हमी खोपकर यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

 

 

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात सिने इंडस्ट्री निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बॉलिवूड उत्तर प्रदेशात जाणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले असून या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी काल इशारा दिला होता.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात सिनेइंडस्ट्रि निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बॉलिवूड उत्तर प्रदेशात जाणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले असून या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दिला आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. हॉलीवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बॉलिवूडमध्ये बनत आहे. या बॉलिवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कास्टिंग काऊच करणाऱ्यांना अटकेची मागणी’, तर राज ठाकरेंनी केलं ‘त्या’ तरुणींचं कौतुक!

News Desk

मुंबई सायबर विभागाचा ई-मेल आयडी हॅक!

News Desk

UP मध्ये मराठी भाषा शिकवा; भाजपच्या ‘या’ नेत्याने योगींना लिहिले पत्र

Aprna