HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेचे संताप मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन..

मुंबईः एल्फिस्टन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगरीचेंगरीनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी चर्चगेट रेल्वे मुख्यालयावर संताप मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, प्रवाशी सहभागी झाले होते. सकाळी अकरा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मनसे कार्यकर्त्यांनी विविध रंगाचे पोशाख परिधान केले होते. त्यावर अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे, तरी मोठ्या संख्येने मोर्चेकरी चर्चगेटच्या दिशेने रवाना झाले होते. दरम्यान राज ठाकरे स्वतः मोर्चात सहभागी झाले असून त्यांनी चर्चगेट मुख्यालयात धाव घेतली आहे. तेथे त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना प्रवाशांच्या सुरक्षेबाबात प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, मोर्चामुळे वाहतूक व्यवस्थेत किरकोळ बदल करण्यात आले होते. सध्या चर्चगेट स्थानकात मोठी गर्दी झालेली आहे. यामुळे प्रवाशी ताटकळलेले दिसून आले.

राज ठाकरेंनी रेल्वेच्या सुरक्षेसह रेल्वे विभागाच्या परीक्षा मराठी भाषेत घेण्यासाठी अनेकदा आंदोलने केली आहे. काही ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी परीक्षा उधळून लावल्या आहेत. मराठी माणसांसाठी त्यांचे सतत आंदोलन सुरू असते. परंतु रेल्वे हा विषय त्यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिला आहे. आजही ते रेल्वे विषयावर आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राष्ट्रवादी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावली

News Desk

संप सुरू असला तरी बरेच कर्मचारी कामावर येण्यास तयार | एसटी महामंडळ

News Desk

नांदेडचा महापौर बाहेरचा मंत्री येऊन ठरवणार का ? नांदेडचा महापौर हा नांदेडची जनताच ठरवणार.

News Desk
मुंबई

भावी पोलिसांसाठी मनसे आली धावून

News Desk

नवी मुंबई | राज्यभरातून पोलीस भरतीसाठी मुंबईत येणा-या ग्रामीण भागातील तरुणांचे नेहमीच हाल होतात. यावर अनेकदा बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. आरोप प्रत्यारोप होतात मात्र कोणीही या तरुणांची मदत करताना दिसून येत नाही. मात्र यावेळी नवी मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांच्या राहण्याच्या व्यवस्था करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तरुणांच्या मदतीला धावून आल्याचे चित्र सध्या नवी मुंबईत पहायला मिळत आहे.

नवी मुंबईत मनसे कार्यकर्ते गजानन काळे यांनी या पोलीस भरतीसाठी आलेल्या सुमारे ४०० ते ५०० मुला-मुलींची रहाण्याची व जेवण्याची व्यवस्था केल्यामुळे नवी मुंबई ग्रामीण बेरोजगार तरुणांसाठी मनसे धावून आली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ग्रामीण भागातून भरतीसाठी आलेल्या तरुणांना नेहमीच रात्रीच्या वेळी पदपथावर झोपावे लागते. दरवर्षीच्या या समस्यांवर तोडगा काढत मनसे कार्यकर्त्यांनी केलेली ही व्यवस्था सध्या नवी मुंबईत चर्चेचा विषय ठरली आहे.

Related posts

व्यापाऱ्यांना फटाका विक्री परवान्यासाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदत

News Desk

मराठा पक्ष स्थापनेचा घोषणा?

News Desk

दारुच्या नशेत बाथटबमध्ये बुडून अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू | फॉरेन्सिक रिपोर्ट

News Desk