HW News Marathi
Covid-19

‘मनसे’च्या हर्षवर्धन जाधव यांचा राजकारणातून संन्यास, दिले ‘हे’ कारण

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे औरंगाबादचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि भाजप खासदार रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आता अनेक उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. काहीच महिन्यांपूर्वी हर्षवर्धन जाधव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला होता. यावेळी बोलताना हर्षवर्धन जाधव असेही म्हणाले कि, “मी राजकारणातून संन्यास घेत असलो तरी माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी म्हणून मी माझी पत्नी संजना जाधव यांची निवड केली आहे.”

‘मनसे’मध्ये प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांना औरंगाबादचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता तडकाफडकी हर्षवर्धन जाधव यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतल्याने त्यामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. हर्षवर्धन जाधव यांनी आज (२३ मे) सोशल मीडियात आपला व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ते असे म्हणाले कि, “आता लॉकडाऊन सुरु असल्याने सर्वच जण आपापले छंद जोपासत आहेत. मीदेखील माझा आध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. यादरम्यान, आपण ज्या गोष्टींमागे विनाकारण पळत राहतो त्या कितपत खऱ्या आहेत याची जाणीव मला झाली आहे. म्हणूनच मी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे, माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी म्हणून मी माझी पत्नी संजना जाधव यांची निवड केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परप्रांतीयांना आपापल्या राज्यात जाण्याकरता नोडल अधिकाऱ्यांकडे फॉर्म भरुन द्यावा लागणार

News Desk

पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाण विधानसभेच्या अध्यक्ष पदाची ऑफर स्वीकारणार का?

News Desk

देशाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे केंद्राचे प्रयत्न सुरू

News Desk