HW News Marathi
महाराष्ट्र

बाळासाहेब ठाकरे असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचे नाव दिलं असतं- राज ठाकरे

मुंबई | नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं ठरवलं आहे. तर काही स्थानिक नागरिकांकडून विमानतळाला दि .बा. पाटील असं नाव देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झालाय. तर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. कोणतंही विमानतळ जेव्हा येतं तेव्हा ते शहराच्या बाहेर येतं. त्यामुळे तेव्हा ते सांताक्रूझमध्ये आलं. नंतर ते सहारपर्यंत गेलं. नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळच नाव द्यावं असं मला वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

आपण आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल बोलत आहोत या गोष्टींचं भान असायला हवं. जे नाव आहे ते कसं बदलणार?. आता बाळासाहेब असते तर त्यांनी स्वत: सांगितलं असतं की छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले. मुळात नामांतराचा वाद हेच दुर्दैव आहे. खरंतर विमानतळ लवकर होण्यासाठी राज्य सरकारनं रेटा लावला पाहिजे. महाराष्ट्रात येणारं विमान शिवाजी महाराजांच्या भूमीत येणार त्यामुळे त्यांचंच नाव असायला हवं, असं राज ठाकरेंनी खडसावून सांगितलं आहे.

नवी मुंबईतील विमानतळालादेखील शिवरायांचंच नाव दिलं जावं

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन पुकारलं आहे. तर शिवसेनेनं विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर राज यांनी त्यांची भूमिका जाहीर केली. ‘मुंबईत विमानतळाला असलेली जागा कमी पडू लागली आहे. त्यामुळे नवी मुंबईत विमानतळ उभारलं जात आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला आणि देशांतर्गत विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे नवी मुंबईतील विमानतळालादेखील शिवरायांचंच नाव दिलं जावं,’ असं राज ठाकरे म्हणाले.

‘बाळासाहेब ठाकरे आदरणीय आहेतच. दिवंगत दि. बा. पाटील ज्येष्ठ नेते होते. पण नवी मुंबईतील विमानतळ हे मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचाच भाग आहे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. मुंबईत जागा नसल्यानं नवी मुंबईत विमानतळ उभारलं जात आहे. त्या विमानतळाचा आंतरराष्ट्रीय कोडदेखील मुंबई विमानतळाप्रमाणेच BOM असा असणार आहे. त्यामुळे त्या विमानतळाला छत्रपती शिवरायांचं नाव देण्यात यावं,’ अशा शब्दांत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

‘महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. परदेशातून येणारा माणूस हा शिवरायांच्या भूमिकेत येत असतो. त्यामुळे विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव संयुक्तिक असेल. आज बाळासाहेब असते, तर त्यांनी स्वत:देखील शिवरायांचंच नाव विमानतळाला देण्याचा सल्ला दिला असता. विमानतळाला शिवरायांचं नाव दिलं जाणार असेल तर कोणाचाही त्याला विरोध नाही. स्थानिकदेखील त्याला विरोध करणार नाहीत, असं प्रशांत ठाकूर यांनी मला सांगितलं आहे,’ असं राज म्हणाले.

आता बघू कोण विरोध करतं, राज ठाकरे गरजले

विमानतळाला बाळासाहेबांचं नाव द्या, अशी मागणी शिवसैनिकांची आहे. त्यांचा दि. बा. पाटील नावाला विरोध आहे, त्याबद्दल काय वाटतं, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावर छत्रपती शिवरायांचं नाव देण्यात यावं, ही माझी भूमिका आहे. आता बघू कोण विरोध करतं, अशा शब्दांत राज ठाकरे गरजले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MaharashtraResult2019 : पवारांच्या ‘त्या’ भाषणामुळे उदयनराजेंचा पराभव

News Desk

राज्यातील कीर्तनकारांना महिन्याला 5 हजार मिळणार! ठाकरे सरकारचा निर्णय

News Desk

“एकदा का उद्रेक झाला तर कोणी रोखणार नाही”, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन उदयनराजे झाले आक्रमक 

News Desk