HW News Marathi
महाराष्ट्र

‘आरे’च्या निर्णयानंतर अमित ठाकरेंनी काका आणि उद्धव ठाकरेंचे मानले आभार!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (११ ऑक्टोबर) आरे येथे कारशेड होणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर सरकारच्या या निर्णयाचे काही स्तरांतून स्वागत करण्यात आले तर काहींनी टीकेची झोड उठवली. ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे मनसेने मात्र स्वागत केले आहे. “सर्वांनी एकत्र येऊन दिलेला लढा यशस्वी होतो. “आरे’च्या लढ्याने हेच सिद्ध केलंय. एका अर्थाने हीच आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे. “आरे’बाबत योग्य निर्णय घेणारे मुख्यमंत्री आणि राज्य सरकार यांचेही आभार,’ अशा शब्दांत मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी त्यांचे काका आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

मुंबई मेट्रोच्या कार शेडसाठी आरेची जागा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने रद्द केला आहे. “आरे’ऐजवी आता कांजूर येथे ही कारशेड होणार आहे. ही संपूर्ण जागा एकही रुपया न आकारता मेट्रोला देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आपल्या भूमिकांवर जे ठाम असतात, त्यासाठी न थकता, न थांबता संघर्ष करण्याची ज्यांची तयारी असते, तेच अखेर विजयी होतात. मेट्रो कारशेडसाठी “आरे’ जंगलाचा, तिथल्या झाडांचा बळी जाऊ नये, यासाठी सातत्याने ज्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला, आंदोलनं केली, प्रसंगी तुरुंगवासही भोगला. पण, पर्यावरण संवर्धनाचा आपला मुद्दा सोडला नाही, अशा सर्व पर्यावरणप्रेमींना माझा सलाम!’ अशी पोस्ट अमित ठाकरेंनी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंनी अखेर दिलं स्पष्टीकरण!

News Desk

फक्त ‘ऐकीव’ माहितीच्या आधारावर परमबीरसिंहांकडून अनिल देशमुखांवर ‘ते’ आरोप?

News Desk

एसटीची वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील

News Desk