HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने भोसरी MIDC मधील धक्कादायक प्रकार आणला उघडकीस

पुणे | कामगारांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. छोट्या मोठ्या कंपनीतून अचानक कामगारांना कामावरून कमी करण्याच्या घटना सातत्याने घडत असताना पुण्यातून एक अशीच बातमी समोर येत आहे. पुण्यातील भोसरी एम.आय.डी.सी. मधील मुद्रा इंडस्ट्रीज या कंपनीत गाड्यांचे स्पेअर पार्ट तयार केले जातात. या मुद्रा इंडस्ट्रीचे नवे नाव हे ‘Datson’ असे असून जुन्या कंपनीच्या नावापासून अनेक कामगार गेली १७ वर्ष काम करत आहेत. मात्र, याच जुन्या कामगारांना अचानक कोणतीही पूर्वसुचना न देता कमी करण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे त्यांची कामं करताना बोटं तुटली आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. हे कामगार शारीरिक दुखापत होऊन देखील गेली अनेक वर्ष ते काम करत होते, पण त्यांची अशी अचानक नोकरी गेल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, हे प्रकरण आता महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने हाती घेतली असून कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपचिटणीस अक्षय पनवेलकर यांनी पुण्याचे सहाय्यक कामगार आयुक्त गायकवाड यांच्याकडे थेट तक्रार दाखल केली आहे. इतकंच नाही तर फॅक्टरी इंस्ट्रॅक्टर निकोले यांच्याकडे देखील कामगारांना झालेल्या शारीरिक दुखापती बाबत तक्रार केली आहे. यात प्रामुख्याने कामगारांच्या सेवेची बाकी असलेली १६-१७ वर्षे कशी भरून काढली जाणार याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने आवाज उठवला आहे.

कामगारांची व्यथा काय?

गेली १५-१६ वर्ष काम करणारे अनिल तुकाराम कौदरे (वय ४५) हे आपली व्यथा सांगताना म्हणत होते की, “गेली १५-१६ वर्ष मी या कंपनीत काम करत होतो. काही वर्षांपूर्वी काम करताना माझं बोट गेलं. आणि जेव्हा मी या विरोधात आवाज काढला तेव्हा माझी नोकरी गेली. मग मी या सगळ्या प्रकाराची माहिती घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेकडे गेलो आणि त्यांच्याकडे दाद मागितली”.

तर दुसरे कामगार रामदास गणपत आढारी ( वय ३७) यांनी असं म्हटलं की, “गेली अनेक वर्ष इमाने इतबारे या कंपनीसाठी काम करत होतो. पण मालकाने आम्ही ज्या कंपनीत काम करत होतो ती बंद करत नव्या नावाने कंपनी सुरु करत फक्त आम्हाला बाजूला केलं”.

काय म्हणाले केतन नाईक?

कामगारांना हवं तसं वापरायचं आणि गरज संपली की हाकलून द्यायचं हा प्रकार महाराष्ट्रातील सर्वच औद्योगिक क्षेत्रात सुरु आहे. सरकार या विषयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असताना कामगारांनी नेमकं कुठे जायचं ?, असा सवाल मनसे कामगार सेनेचे चिटणीस  केतन नाईक यांनी केला आहे.

दरम्यान, याआधी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक आणि परशुराम साळवे यांनी या मुद्रा इंडस्ट्रीजला भेट देत कामगारांचे प्रश्न जाणुन घेतले होते. कामगारांच्या समस्यांबाबत व्यवस्थापनाशी चर्चा करण्यासाठी गेले असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी येणार हे कळताच चर्चे आधीच पळ काढणाऱ्या व्यवस्थापनाला केतन नाईक यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कामगारांनी रोखून ठेवले होते. त्याचाच राग व्यवस्थापन काढत आहे, असा आरोप करण्यात येत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आर्यन खानचा एनसीबी कोठडीमधील मुक्काम दोन दिवसांनी वाढला

News Desk

शरद पवार म्हणतात याला तर कृषी मंत्रालय जबाबदार

News Desk

किरीट सोमय्या म्हणतात,’आगे आगे देखो होता है क्या’, देशमुख, परबांनंतर आता जितेंद्र आव्हाडांचा नंबर

News Desk