HW News Marathi
महाराष्ट्र

पळून कोणाबरोबर गेली अन् लग्न कोणा बरोबर केले, राज ठाकरेंची मिश्किल टीका

मुंबई। पळून कोणाबरोबर गेली, लग्न कोणा बरोबर केले हेच समजेना, अशी मिश्कील टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीवर केली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी २०१९ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील नाट्यमय घडामोडींना उजाळा देत महाविकासआघाडीवर तोफ डागली.

राज ठाकरे म्हणाले, “विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप आणि शिवसेना विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, असे लढले होते. पण, निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला. निवडणुकीपूर्वी अडीच अडीच वर्षे ठरली होती. उद्धव ठाकरे म्हणात, मी अमित शहांशी एकांतात बोलोलत, आणि शहा म्हणातात आमच्याशी चर्चा झाली नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचे हित साधले जात असेल तर इतरांचेही अनुकरण करू!

News Desk

अजित पवारांनी कोल्हापूर दौऱ्यात पूरस्थितीबाबत केल्या महत्त्वाच्या घोषणा…!

News Desk

‘आरे’साठी सर्वंकष विकास आराखडा लवकरच तयार करण्यात येईल! – राधाकृष्ण विखे पाटील

Aprna