HW News Marathi
महाराष्ट्र

‘सत्ता येत-जात असते, कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही,’ राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज्य सरकारला आमचे एकच सांगणे आहे. “आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येते-जात असते. कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही,” अशी टीका राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. या पत्रात मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसैनिकांनी ४ मे रोजी ‘भोंगे उतरवा’ आंदोलन सुरू करण्यापूर्वीच पोलिसांनी २८ हजारांना नोटीस आणि हजारोंना तडीपार तर काही जणांना तुरुंगात डांबले,” मसनसैनिकांवर केलेल्या कारवाईवरून राज ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली. 

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या जामीन अर्जावर १७ मे रोजी सुनावणी होणार आहे. देशपांडेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल असून यामुळे अटकपूर्व जामीनासाठी देशपांडेंनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. देशपांडे जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यात आता देशपांडेंची पुढील सुनावणी १७ मे रोजी होणार आहे. देशपांडेसह संतोष धुरी फरार आहेत. मुंबई पोलिसांनी मनसे नेते, मनसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांवरील कारवाई करण्यात आली.

राज ठाकरेंनी पत्रात नेमके काय म्हणाले

सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखे वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्णयाची अंमबलजावणी व्हावी. यासाठी माझ्या मनसैनिकांनी ४ मे रोजी ‘भोंगे उतरवा’ सुरू करण्यापूर्वीच राज्य सरकारने  ठिक ठिकाणी त्यांची धरपडक करण्यात आली. यानुसार, तब्बल २८ हजार मनसैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिस बजावल्या, हजारोंना तडीपार केले आणि अनेकांना तर तुरुंगात डांबले. कशासाठी ? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!” असे त्यांनी पत्रात म्हटले.

गेल्या अठवड्याभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे. ते पाहाता मला प्रश्न पडलाय की; मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी ‘धरपकड मोहीम’ राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का?, आमच्या संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले ‘रझाकार’ आहेत. अर्थात महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उड्या डोळ्यांनी बघत आहेत. 

 राज्य सरकारला आमचे एकच सांगणे आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येते-जात असते. कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही.

उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तलाठ्यांना सजांमध्ये थांबण्याच्या सूचना; अन्यथा घरभाडे बंद करणार! – बाळासाहेब थोरात

Aprna

Sheena Bora Case : साडेसहा वर्षापासून तुरुंगात असलेली इंद्राणी मुखर्जी अखेर बाहेर

Aprna

“पवारसाहेब पंढरपूर पोटनिवडणुकीची काळजी करु नका, इकडचा कार्यक्रम आम्ही करतो”

News Desk