HW News Marathi
महाराष्ट्र

लॉकडाऊनपेक्षा राज्यातील मृत्यूदर कसा कमी करता येईल याचे नियोजन करा, मनसेचा सरकारला सल्ला

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन किंवा निर्बंध घातले जात आहे. यावरुन मनसे नेते बाळा नांदगावकरांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे. राज्य सरकारने सरसकट लॉकडाऊनचा आततायी निर्णय अजिबात घेऊ नये, त्यापेक्षा नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्यावर जोर द्यावा, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

अनेक राज्यात जे आपल्या महाराष्ट्रापेक्षा अनेक अर्थाने मागे आहेत, तिथे मृत्यू दर हा अतिशय कमी आहे. हा ही सरकारसाठी संशोधनाचा विषय आहे. ते कमी चाचण्या करतात असे कारण देण्यापेक्षा आपल्या राज्यातील मृत्यूदर कसा कमी करता येईल याचे नियोजन करावं. आधीच आर्थिकदृष्टया त्रस्त जनतेला लॉकडाऊन करून अडचणीत आणू नये, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनुसूचित जाती आरक्षण करीता महामेळावा

News Desk

माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा, राज्याभिषेक सोहळा घरीच साजरा करा

News Desk

तळीये मधल्या मृतांची संख्या ८४, शोधमोहीम थांबलं

News Desk