HW News Marathi
महाराष्ट्र

सोमवारपर्यंत बिल माफ करा नाहीतर…मनसेचं सरकारला अल्टीमेटम

मुंबई | राज्यभरात सध्या वीजबिलात केलेल्या वाढीवावरुन राजकारण रंगले आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही असे सांगितल्यानंतर राज्यभरातून तीव्र पडसाद उमटायला लागले. भाजप, मनसे यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा हाती घेतला. दरम्यान, मनसेने सरकारला अल्टीमेटम दिला आहे. सोमवारपर्यंत सरकारने वाढीव वीजबिलावर निर्णय द्यावा अन्यथा मनसे राज्यभार आंदोलन करणार अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. आज मनसेने या संदर्भात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. तर, मनसेचे सरटिचणीस संदीप देशपांडे यांनीही ट्विट करत रस्त्यावर उतरुन आंदोलनाचा इशारा दिला होता.

तसेच, जे वाढीव वीजबिल आले आहे ते न भरण्याचे आवाहनही नागरिकांना मनसेने केले आहे. तसेच, जनतेचा विशअवासघात केल्दयाची टीकाही नांदगावकरांनी सरकारवर केली आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. यात वीजबिलासंदर्भात काय निर्णय सरकार घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर मनसेच्या या वीजेच्या लढ्यात भाजप मनसेसोबत असल्याचे वक्तव्य माजी उर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘हिंदू महिला, मुलींना जबरदस्तीने हिजाब घालायला लावणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा’ – प्रविण दरेकर

News Desk

मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात, सखल भागांमध्ये साचले पाणी

News Desk

उत्तर महाराष्ट्राचा दौरा अर्धवट, नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना होणार

News Desk