HW News Marathi
Covid-19

“रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार कमी झाली की…”; राज्य सरकारला मनसेचा सवाल

मुंबई | मुंबईपाठोपाठ राज्यातील रुग्णसंख्येची पातळी महिनाभराच्या लॉकडानंतरही खाली घसरताना दिसत आहे. राज्यात काल आढळून आलेल्या रुग्णंसख्येपेक्षा करोनावर मात करून घरी परतलेल्या रुग्णांची संख्या दुप्पट होती. त्यामुळे दिलासादायक चित्र आहे. मात्र, कोरोनाच्या यश-अपयशावरून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाकरे सरकारला सवाल केला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर राज्य सरकारने लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला होता. लॉकडाउनचे परिणाम आता दिसून येत असून, रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईतील परिस्थितीही नियंत्रणात आलेली असून, मुंबई मॉडेलचं कौतुक होत आहे. मुंबई आणि राज्यातील परिस्थितीवर समाधान व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी सवाल उपस्थित केला आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं असून, या ट्विटमध्ये करोना परिस्थितीवरून सरकारला लक्ष्य केलं आहे. “आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे त्याच श्रेय मुंबई मॉडेल, मुख्यमंत्री, पालकमंत्री सगळेच घेत आहेत. म्हणजे रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश, अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यमं कशी घेऊ शकतात?,” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण; अधिवेशनातील आमदार, मंत्र्यांना धोका

Aprna

चीनप्रमाणे भारताला कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणता येईल?

News Desk

सामना अग्रलेख : महाराष्ट्र पुढेच जाईल ! संकटाचे काय घेऊन बसलात !

News Desk