HW News Marathi
Covid-19

राज्यात आज २३ हजारांहून अधिक ‘कोरोनामुक्त’ तर रिकव्हरी रेट ८७.५१ %

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातून आज (२१ ऑक्टोबर) एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, “राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार १४२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात तब्बल २३ हजार ३७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सातत्याने वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा पाहता राज्यात कोरोनास्थिती नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत तब्बल १४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण १ लाख ५८ हजार ८५२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान आणखी एक चांगली बाब म्हणजे सातत्याने राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट वाढत असून सध्या महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.५१% इतके झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षा रद्दच !

News Desk

मुंबई, पुण्यातून बाहेर जाण्यास किंवा आत येण्यास परवानगी नाही

News Desk

मंत्र्यांनो हवेत गोळीबार नको, आता जमिनीवर या !

News Desk