HW News Marathi
Covid-19

दिलासादायक ! राज्यात आज तब्बल २६ हजारांहून अधिक रुग्ण ‘कोरोनामुक्त’

मुंबई । राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा सातत्याने वाढत असून ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने आज (१० ऑक्टोबर) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत ११ हजार ४१६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे याच एका दिवसात तब्बल २६ हजार ४४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत राज्यात ३०८ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण १५ लाख १७ हजार ४३४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी ४० हजार ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण तब्बल १२ लाख ५५ हजार ७७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत राज्यात एकूण २ लाख २१ हजार १५६ रुग्ण विविध रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यात आणखी एका जिल्ह्यात दिवसा संचारबंदी

News Desk

देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ६,५६६ नवे रुग्ण, तर १९४ करोनाबाधितांचा मृत्यू

News Desk

लाॅकाडाऊनच्या काळात दुरदर्शनवर रामायण-महाभारत पुन्हा दिसणार !

Arati More