HW News Marathi
महाराष्ट्र

कोंकण विभागात एस.टी. सेवा पूर्ववत; 4 हजार 910 पेक्षा अधिक कर्मचारी कामावर हजर

मुंबई । कोकण विभगातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या चार जिल्ह्यांतील आगारांत मिळून 4 हजार 910 पेक्षा अधिक कर्मचारी संप सोडून कामावर हजर झाले आहेत. 50 टक्क्याहून अधिक एस.टी. वाहतूक सुरु झाली आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एस.टी. महामंडळाने दिली.

२८ ऑक्टोबर २०२१पासून राज्यातील जवळपास ९२ हजार एस.टी. कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. संपामुळे राज्यातील एस.टी. सेवा ठप्प झाली होती. 8 एप्रिल 2022 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत कोकण विभागाच्या ठाणे जिल्ह्यातील आगारांत 1 हजार 425, रायगड जिल्ह्यातील आगारांत 1 हजार 644, रत्निागरी जिल्ह्यातील आगारांत 1 हजार 125 आणि पालघर जिल्ह्यातील आगारांत 716 कर्मचारी संपसोडून कमावर हजर झाले आहेत.

कोकणात लवकरच शंभर टक्के एस.टी. वाहतूक सुरु होईल असे आगार प्रमुखांकडून सांगण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवछत्रपतींना घडविण्यामध्ये जिजाऊंचाच हात, पुरंदरेंनी ते वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न! – शरद पवार

Aprna

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडतील तेव्हा ती ब्रेकिंग न्यूज ठरेल!”, निलेश राणेंनी पुन्हा डिवचलं

News Desk

उद्धव ठाकरे सरकार चालवतात की माफियांची टोळी, किरीट सोमय्या यांचा सवाल

News Desk