HW News Marathi
Covid-19

राज्यात आज २४ तासांत ५ हजार ५३५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ

मुंबई । राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५३५ नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर याच एका दिवसांत नवीन ५ हजार ८६० रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१९ नोव्हेंबर) याबाबतची अधिकृत माहिती दिली. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यात तब्बल १६ लाख ३५ हजार ९७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

 

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत १५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ४६ हजार ३५६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे राज्यात सद्यस्थितीत कोरोनाचे एकूण ७९ हजार ७३८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.79% इतके झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजधानी दिल्लीत विकेंन्ड कर्फ्यू, अरविंद केजरीवालांची घोषणा

News Desk

इंदूरमध्ये डाॅक्टरांवर हल्ला ! नेमकं काय झालं ,जाणून घ्या ..

Arati More

राज्यात आज 56 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची वाढ

News Desk