HW News Marathi
महाराष्ट्र

कापूस उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

संग्रामपूर | कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या कार्यकर्त्यानी रस्त्यावर टायर जाळून रस्ता अडवून धरला. यावेळी सरकार विरोधी देखील देण्यात आल्या.

सोयाबीन आणि कापुस हमी भाव जाहीर करून शेतकऱयांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. ऑनलाईनच्या गोंधळामुळे गतवर्षी जे शेतकरी पीकविमा भरण्या पासून वंचित राहले. त्यांना ५० टक्के पिकविम्याची रक्कम देण्यात यावी. अश्या मागण्या घेऊन स्वाभिमानी चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. वरवट बकाल या मध्यवर्ती ठिकाणी सकाळी ७ वाजल्यापासून घोषणा देत वाहने अडविण्यात आली. रस्त्यावर टायर जाळून हे आंदोलन करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवरात्रीच्या मुहुर्तावर खडसे राष्ट्रवादीत जाणार ?

News Desk

महाविकास आघाडीच्या स्थिरतेबाबत शरद पवारांच्या मनात शंका नाही!

News Desk

राष्ट्रभक्तीची भावना मनात सतत तेवत ठेवा! – उपमुख्यमंत्री

Aprna