HW News Marathi
महाराष्ट्र

लॉकडाऊनविरोधात वांद्रयात मोठा जमाव, सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी

मुंबई | मुंबईतल्या वांद्रे स्थानकाबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१४ एप्रिल) २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये वाढ करत ३ मेपर्यंत केल्याची घोषणा केली आहे. देशभरात लॉकडाऊन वाढवण्यात आल्यामुळे परराज्यातील हजारो मजुरांनी थेट वांद्रे स्थानका बाहेर तुफान गर्दी केली होती. मजूर गावाला जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी करत आहेत.

या पार्श्वभूमीवर वांद्र स्थानकाबाहेर लॉकडाऊन वाढवण्याविरोधात शेकडोच्या संख्येने लोक स्टेशन बाहेर जमा झाले आहे. तब्बल तीन हजारपेक्षा जास्त लोकांची गर्दी स्टेशन बाहेरील परिसरात जमली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झालेली पाहायला मिळलाी आहे. मात्र, पोलिसांकडून या जमावाला समजवण्यामध्ये यश आले असून पोलिसांच्या शिष्टाईनंतर स्टेशन बाहेर जमलेला जमाव पांगला, असल्याची माहिती मिळली आहे.

“वांद्रे स्थानकातील सध्याची परिस्थिती किंवा सूरतमधील दंगलसारखी वाटत आहे. या संपूर्ण परिस्थितीला केंद्र सरकाराल जबाबदार असल्याचा आरोप पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्वीटरद्वार तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आदित्या ठाकरे पुढे म्हणाले की, परराज्यातून आलेल्या कामगारांना अन्न-पाणी किंवा निवारा नको आहे, त्यांना घरी परतायचे आहे. कामगारांची घरी परत जाण्याची व्यवस्था करण्यास केंद्र सरकार सक्षम नसल्याचाच हा परिणाम आहे,” असे म्हणत केंद्रावर टीका केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCBच्या चौकशीत काय सुरू आहे याचा तपशील माध्यमांना माहिती कसा मिळत आहे? सचिन सावंतांचा प्रश्न

News Desk

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासनाने समन्वय ठेवावा! – मुख्यमंत्री

Aprna

हमाम मे सब नंगे है, टीआरपी घोटाळ्यावरुन जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया!

News Desk