HW News Marathi
देश / विदेश

मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुखांना दिलासा, फेटाळली ‘ही’ याचिका

मुंबई । मुंबई उच्च न्यायालयाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने अनिल देशमुख यांच्याविरोधात अ‌ॅड. जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून त्यांना चांगलेच फटकारले असून “हा निव्वळ लोकप्रियतेसाठी केलेला स्टंट आहे” असे म्हटले आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि मनिषा पिटाले यांच्या खंडपीठासमोर आज (३० मार्च) या याचिकेवर सुनावणी झाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात जयश्री पाटील यांनी उच्च गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. “भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट होण्याआधी भ्रष्टाचारविरोधी कायद्याखाली संबंधित व्यक्ती आणि मंत्र्याला अटक करावे”, अशी मागणी जयश्री पाटील यांनी आपल्या याचिकेत केली होती. मात्र, जयश्री पाटील यांना यावरून उच्च न्यायालयाने फटकारले आहे.

जयश्री पाटील यांच्या या याचिकेत शरद पवार यांच्याही नावाचा समावेश आहे. “मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आपल्या पत्रात केलेले गंभीर आरोप म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे पुरावे आहेत. यात गृहमंत्री अनिल देशमुख, शरद पवार आणि सचिन वाझे हे मास्टरमाईंड आहेत”, असा आरोपीही जयश्री पाटील यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही आणि कधी झुकणार नाही! – सुप्रिया सुळे

Aprna

ट्रम्प यांचा भारतात येण्यास नकार, भारत-अमेरिका संबंध धोक्यात ?

News Desk

बायडन आणि हॅरिस यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक – नरेंद्र मोदी

News Desk