HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई-पुणे-मुंबई महामार्ग बंद, पोलिसांची महामार्गावरील वाहनचालकांची कसून चौकशी सुरु

मुंबई | कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने अनेक जिल्ह्यांमध्ये जमाव बंदी करण्यास सुरुवात केली आहे. काल (२२ मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात जमावबंदी लागू केल्यानंतर आज (२३ मार्च) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुना महामार्ग हे दोन महत्त्वाचे महामार्ग जे मुंबई आणि पुण्ययाला जोडतात ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. या मार्गावरून फक्त अत्यावश्यक सेवांचा पुरवठा करणाऱ्यांनाट सोडले जात आहे. यासाठी खारघर, कळंबोली अशा नाक्यांवर पोलिसांची पथकेही तैनात करण्यात आली आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची पोलीस कसून चौकशी करत आहेत. जर ती व्यक्ती अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांपैकी नसेल, तर तिला पुन्हा माघारी पाठवले जात आहे. मात्र, इतक्या मोठ्या महामार्गाला बंद केल्यानंतर पोलिसांनाच्या नाकी नऊ आले आहेत.

काल (२२ मार्च) दिवसभर देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केल्याप्रमाणे जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट होता. मात्र, जनता कर्फ्यू संपताच नागरिकांनी टाळ्या आणि थाळ्यांच्या मार्फत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या लोकांना प्रोत्साहन दिले आणि कौतुक केले. परंतु, आज सकाळपासून एक वेगळेच चित्र दिसत आहे. बेस्ट बसच्या सेवा या फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच सुरु आहेत परंतु यात सामान्य नागकिरही मोठ्या संख्येने प्रवास करताना निदर्शानास आले. परंतु, काही वेळापुर्वी आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत नागरिकांना सरकारच्या आज्ञेंचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पण जर सांगून देखील नागरिकांनी नियम पाळले नाहीत, कारण नसताना किंवा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांपैकी नसताना देखील ते घराबाहेर पडले, तर मात्र नाईलाजाने पोलीसांना कारवाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीला मोठा धक्का, सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार

News Desk

अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असता तर तिला न्याय मिळाला असता

News Desk

‘भारतरत्नां’च्या चौकशीऐवजी ‘त्या’ सेलिब्रिटींची चौकशी करा, भाजपची गृहमंत्र्यांकडे पत्रातून मागणी

News Desk