HW News Marathi
Covid-19

मुंबई, पुण्यातून बाहेर जाण्यास किंवा आत येण्यास परवानगी नाही

मुंबई | पोलीस आयुक्‍तालय असलेल्‍या शहरात आंतरराज्‍य किंवा आंतरजिल्‍हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्‍तांना देण्यात आले आहेत. असे असले तरी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआर) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील (पीएमआर) नागरिकांना महाराष्‍ट्रातील अन्य जिल्ह्यात किंवा अन्य जिल्ह्यातून या क्षेत्रात येण्याची परवानगी मिळणार नाही, असा खुलासा राज्‍य सरकारनेच केला आहे. मात्र, या क्षेत्रात अडकलेल्‍या परप्रांतातील मजुरांना महाराष्‍ट्राबाहेर जाण्याची परवानगी आहे.

ज्‍या शहरांमध्ये पोलीस आयुक्‍तालये आहेत त्या शहरांमध्ये जिल्‍हयाच्या बाहेर किंवा राज्‍याच्या बाहेर जाण्याच्या परवानग्‍या देण्यात येत आहेत.पण मुंबई आणि पुणे महानगर प्रदेश क्षेत्रात असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेउन या दोन्ही क्षेत्रांतून महाराष्‍ट्रातील अन्य जिल्‍हयांत किंवा अन्य जिल्‍हयांतून या क्षेत्रांमध्ये येण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

या दोन्ही क्षेत्रात जे परराज्‍यातील मजूर अडकून पडले आहेत त्‍यांना महाराष्‍ट्राबाहेर आपापल्‍या राज्‍यात जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. अशा परवानगीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. सर्व पोलीस ठाण्याची माहिती एकत्र करून त्या विभागाच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठविली जाईल.

अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. कृपया अर्धवट किंवा अनधिकृत किंवा ऐकीव, सांगोवांगीने दिल्या जाणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, कोणीही कुठेही धावाधाव करू नये. राज्य सरकारच्या सर्व निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन सरकारने केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

म्युकरमायकॅासिस म्हणजे काय ? लक्षण काय आहेत ?उपचार कोणते ?

News Desk

राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण!

News Desk

कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय, सावधगिरी बाळगणे महत्वाचे – राजेश टोपे

News Desk