HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत ऑक्टोबरपर्यंत ट्रेन सुरु होण्याचे आदित्य ठाकरेंनी दिले संकेत!

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन संपूर्ण जगात, राज्यात जरी सुरु असला तरी हळूहळू अनलॉक करत पूर्वीसारखे जीवन सुरळीत करण्याच्या मार्गावर आहे. अशात गेले अनेक महिने सामान्य लोकांसाठी बंद असणारी लोकल ट्रेन लवकरच सुरु होईल असे संकेत मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात लोकल सुरु करण्याचा विचार केला जात आहे. दरम्यान, आता जरी ट्रेन सुरु असली तरी ती केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरु आहे. तसेच, पुन्हा एकदा २४ तास ऑफिसेसही सुरु करण्याचा विचार करत असल्याची माहिती देखील आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

हळूहळू मुंबईत सर्व काही पुर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे. लोकांचे गर्दी पुन्हा रस्त्यावर दिसू लागली आहे. तसेच, लवकरच रेस्टोरंट देखील सुरु करण्याच्या विचारात आहोत. जो पर्यंत आपल्याकडे पुरेशी आरोग्य सेवा आहे, ऑक्सीजन, व्हेटींलेटर या सर्व बाबी पुरेशा आहेत त्या आधारे आपण हळूहळू सर्व काही उघडण्यास सुरुवात करु शकतो. अर्थात हे सर्व काही लोकं कशा पद्धतीने काळजी घेतात, सॅनिटायझेशन करतात यावर अवलंबून आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राज्यास सुदृढ होण्यासाठी मदत करणार – मुख्यमंत्री

News Desk

“बॉलिवूड इंडस्ट्रीत आज एकापेक्षा अधिक दिग्गज आहेत, ते गप्प का आहेत?”, राऊतांचा सवाल

News Desk

स्वबळावर निवडणुका लढवण्याची आमची भूमिका योग्यच! काँग्रेसचा पुनरुच्चार

News Desk