HW News Marathi
महाराष्ट्र

कल्याण-डोंबिवलीचे सर्व प्रवेशद्वार बंद करण्याचे महानगरपालिकाच्या आयुक्तांचे आदेश

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. मुंबईसह कल्याण-डोंबिवली परिसरात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहेत. देशभरात लॉकडाऊन सुरू असताना काही नागरिक विनाकरण रस्तावर फिरत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कठोर निर्णय घेतला आहे. कल्याण-डोंबिवलीचे सर्व प्रवेशद्वार बंद करण्याचे आदेश महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

आयुक्तांच्या आदेशानुसार कोणताही नागरीक परवानगी शिवाय महानगरपालिकेच्या हद्दीतून आत-बाहेर येऊ जावू शकत नाही. या संदर्भात अधिनियम व महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम २०२० चा नियम ३ नुसार महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कल्याण-डोंबिवली शहरातील सर्व प्रवेशद्वारावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रवेश बंद करण्यात यावा, अत्यावश्यक असेल, तरच बाहेरील नागरीकांची आरोग्य तपासणी करुनच शहरात प्रवेश द्यावा, अशा सूचना पालिकांनी दिल्या आहेत.

महनगरपालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधित रूग्‍णांची संख्‍या ३४ वर पोहोचली आहे. त्‍यापैकी डोंबिवली येथील लग्‍न सोहळ्याशी संबंधित एका रुग्‍णाला कस्‍तुरबा रुग्‍णालयातून पुर्नतपासणी त्याय महिलेला डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे डिस्चार्ज मिळालेल्‍या रुग्‍णांची संख्‍या आता ६ झाली आहे. यात ४ कल्‍याण आणि २ डोंबिवलीमधील रुग्णांचा समावेश आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य ‘सहकाराचा’ आणखी एक अंक-  अतुल भातखळकर

News Desk

साताऱ्यात बस डेपोमधल्या ६ शिवशाही बसेसला लागली आग

News Desk

सुशासन नियमावलीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

Aprna