HW News Marathi
Covid-19

माझा पत्ता राज्यातील नेत्यांनीच कट केला, खडसेंचा महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वावर टीका

मुंबई | “माझा पत्ता कट होण्यामागे केंद्रीय नेतृत्वाचा काहीही संबंध नाही. राज्यातील नेत्यांनीच पत्ता कट केला आहे. राज्यातील नेत्यांनीच केंद्रीय नेतृत्वाकडे माझ्याविरोधात विषपेरणी केली आहे,” असा आरोप भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यातील भाजप नेत्यांवर केला आहे. भाजपकडून विधान परिषदेचे तिकीट न मिळाल्यामुळे खडसेंना महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वावर सडकून टीका केली आहे.

पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत संसदीय बोर्डाच्या बैठकीत पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत ज्यांच्या नावाची साधी चर्चा देखील झाली नाही, अशा लोकांना विधानपरिषदेचे तिकीट दिले. आमची नावे फायनल होऊनही आमचा पत्ता कापण्यात आला. केंद्रीय पक्षश्रेष्ठींना हा सर्व प्रकार सांगणार असल्याचे खडसे म्हणाले. जर पक्षश्रेष्ठींकडून समाधान नाही झाले तर मग पुढे निर्णय घेईल, असे संकेतही त्यांनी माध्यमांना दिले. मात्र, विधानपरिषदे निवडणुकीत झालेल्या राजकारण पक्षश्रेष्ठींच्या कानावर ही बाब टाकल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. माझा पत्ता कट होण्यामागे केंद्रीय नेतृत्वाचा काहीही संबंध नाही. राज्यातील नेत्यांनीच पत्ता कट केला आहे. राज्यातील नेत्यांनीच केंद्रीय नेतृत्वाकडे माझ्याविरोधात विषपेरणी केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

प्रतिज्ञापत्रावर मार्च महिन्याच्या तारखा आल्या कशा?

पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत ज्यांच्या नावाची साधी चर्चा देखील झाली नाही, अशा लोकांना विधानपरिषदेचे तिकीट दिले. आमची नावे फायनल होऊनही आमचा पत्ता कापण्यात आला. ज्यांना तिकीट देण्यात आले त्यांनी रात्रभरात उमेदवारी अर्जासोबत लागणारी कागदपत्रे आली कशी? त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर मार्च महिन्याच्या तारखा आल्या कशा? याचा अर्थ त्यांना उमेदवारी मिळणार हे मार्चमध्ये ठरले होते, सवाल खडसेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. खडसे पुढे म्हणाले, मग आम्हाला मूर्ख बनवून आमची फसवणूक करण्याचा आल्याचे त्यांनी सांगितले. पक्षातील निष्ठावंतांना तिकीट दिले असते तर आम्ही समलो असतो. पण, ज्या मेघा कुलकर्णीं यांच्या विधानसभेत चंद्रकांत पाटील यांंच्यासाठी आमदारकीची जागा सोडली त्यांना तरी विधानपरिषदेचे तिकीट द्यायला हवे होते ना? असे अनेक सवालही त्यांनी उपस्थित करत राज्यातीत भाजप नेतृत्वाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ५२ हजारांच्या पुढे नवे रुग्ण

News Desk

अयोध्येत रामनवमीला राम जन्मभूमीत भक्तांना जाण्यास बंदी, घरीच रामजन्मोत्सव साजरा करण्याचं आवाहन 

News Desk

जाणून घ्या…मुंबई-पुण्यामधून कोणत्या राज्यासाठी धावणार रेल्वेच्या विशेष ट्रेन

News Desk