HW News Marathi
Covid-19

#Lockdown : ‘वंदे भारत’चा दुसरा टप्पा १६ ते २२ मे असणार

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात तिसरा लॉकडाऊन सुरु आहे. अशात अनेक लोकं भारतात विविध भागात तर अडकले आहेत. पण, परदेशआतही अनेक भारतीय अडकले आहेत त्यांना आपल्या मायभूमी आणण्यासाठी केंद्र सरकारने वंदे भारत हे मिशन सुरु केले होते. याचा आता दुसरा टप्पा १६ मे ते २२ मे या काळात पार पडणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात ३१ देशांत १४९ विमाने पाठवत भारतीयांना मायदेशी आणण्यात येणार आहे.

या मिशनच्या पहिल्या टप्प्यात ११ मेपर्यंत १२ देशांमधून ५ दिवसांत ६८३० लोकं परत आली आहेत. तर या पहिल्या टप्प्यात ६४ विमानांमधून १५ हजार लोकांना आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. १२ मेपर्यंत ९ देशांमधून १२ विमानांतून भारतीय मायभूमी परतणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात सलून-ब्युटी पार्लरकरिता पाळावेच लागणार ‘हे’ नियम

News Desk

पडळकरांनी भरवला फडणवीसांना पेढा,पंढरपूरच्या विजयाचं मुंबईत सेलिब्रेशन !

News Desk

महाराष्ट्रात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या ८ वर; देशातील एकूण संख्या १२ वर

News Desk