HW News Marathi
महाराष्ट्र

लॉकडाऊनमध्ये शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी, पालकांकडून शिक्षण शुल्क भरण्याची सक्ती करू नये !

मुंबई | महाराष्ट्र कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लॉकडाऊनचा कालवधी ३ मेपर्यंत वाढवला आहे. या कालवाधीत शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी, पालकांना चालू व आगामी वर्षाचे शिक्षण शुल्क भरण्याची सक्ती करू नये, असे करणाऱ्या शाळांविषयी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

विद्यार्थ्यी आणि पालकांच्या सोशल मीडिया आणि फोनच्या माध्यमातून तक्रारी आल्या की, “लॉकडाऊनच्या काळात त्यांच्याकडून शाळा फी मागण्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सध्या देशासह राज्यात ३ मेपर्यंत लॉकडाऊनचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. राज्याची सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहाता आणि पालकांकडे असलेली पैशांची उपलब्धता पाहात. सर्व शाळांना आणि संस्थांना शालेय विभागाच्या माध्यमातून एक परिपत्रक पाठवले आहे. या परिपत्रकानुसार, लॉकडाऊनच्या काळात आपण विद्यार्थ्यांनकडून फीची मागणी करू नये. आणि तशी मागणी होत असे, तर शिक्षण मंत्र्यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना आवाहन केले की, त्यांनी त्या ठिकाणच्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याकंडे तक्रार नोंदवी. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य शासनाने जे पत्र पाठवलेले त्यांची अंबलबजावणी व्हावी,” असे आदेश वर्षा गायकवाड यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारताच्या अवनी लेखराकडून आणखी नेमबाजीत रौप्यपदक!

News Desk

“…तोपर्यंत हा सगळा गोंधळ थांबणार नाही” – संजय राऊत

News Desk

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक

News Desk