HW News Marathi
महाराष्ट्र

नगरपंचायतींच्या नगराध्यक्षाची निवडही आता थेट जनतेतून

मुंबई – नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष, सरपंच आणि आता नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाची निवडही आता थेट जनतेतून होणार आहे. या बाबतचा महत्वपूर्ण निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुढच्या काळाच होणाऱ्या नगरपंचायतींच्या निवडणूकीत नगराध्यक्षाची निवड ही थेट जनतेतून होणार आहे.

नगराध्यक्ष आणि संरपंचांची थेट जनतेतून निवड करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला होता. या निर्णयाचा फायदा भाजपला नक्कीच झाला. त्यामुळे आता नगरपंचायतींच्या नगराध्यक्षाची निवडही थेट जनतेतून होणार आहे. त्या बाबतचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे या पुढच्या काळात ज्या नगरपंचायतींच्या निवडणूका होणार आहे त्यात नगराध्यक्षाची निवड ही थेट जनतेतून होणार आहे. दरम्यान राज्यातल्या अनेक नगरपालिकांमध्ये बहुमत एका पक्षाकडे आणि नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा अशी स्थितीत आहे. त्यामुळे अशीच स्थिती आता नगरपंचायतींमध्येही होण्याची दाट शक्यता आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

थोर विधीरत्न राम कदमांना केंद्र आणि राज्य सरकारमधला फरकही कळत नाही!

News Desk

नागपूर विभागातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पशुधन विमा योजना पोहाेचवा – मंत्री सुनील केदार

Aprna

शिक्षकांच्या अनुकंपाधारकांची प्रकरणे लवकरच निकाली काढणार

News Desk