HW News Marathi
महाराष्ट्र

नगरपंचायतींच्या नगराध्यक्षाची निवडही आता थेट जनतेतून

मुंबई – नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष, सरपंच आणि आता नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाची निवडही आता थेट जनतेतून होणार आहे. या बाबतचा महत्वपूर्ण निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुढच्या काळाच होणाऱ्या नगरपंचायतींच्या निवडणूकीत नगराध्यक्षाची निवड ही थेट जनतेतून होणार आहे.

नगराध्यक्ष आणि संरपंचांची थेट जनतेतून निवड करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला होता. या निर्णयाचा फायदा भाजपला नक्कीच झाला. त्यामुळे आता नगरपंचायतींच्या नगराध्यक्षाची निवडही थेट जनतेतून होणार आहे. त्या बाबतचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे या पुढच्या काळात ज्या नगरपंचायतींच्या निवडणूका होणार आहे त्यात नगराध्यक्षाची निवड ही थेट जनतेतून होणार आहे. दरम्यान राज्यातल्या अनेक नगरपालिकांमध्ये बहुमत एका पक्षाकडे आणि नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा अशी स्थितीत आहे. त्यामुळे अशीच स्थिती आता नगरपंचायतींमध्येही होण्याची दाट शक्यता आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्रात सातव्या वेतन आयोगाला अखेर मुहूर्त लाभला

News Desk

पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होईपर्यंत पालकांकडून फी मागू नये

swarit

“मोदी सरकार आणि योगी सरकार बरखास्त करा” – नाना पटोले

News Desk
Uncategorized

राहुल गांधीं बरोबर हात मिळवणी सर्वांसमोर करेन !

News Desk

अहमदाबाद – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बरोबर हातमिळवणी करायची असेल तर ती सर्वांच्या समोर करेन असे सांगत राहुल गांधी बरोबर गुप्त बैठक झाल्याचे वृत्त पाटीदार समाजाचा नेता हार्दीक पटेल याने फेटाळून लावले आहे. एका खाजगी वृत्तवाहीनीने हार्दीक आणि राहुल यांची भेट झाल्याचे वृत्त दाखवले होते. शिवाय राहुल गांधी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये हार्दिक आल्याचे सीसीटीव्ही फुटेजही दाखवण्यात आले होते. त्यानंतर गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली होती.

हार्दीक पटेल यांना पाटीदार समाजाचा मोठा पाठींबा आहे. त्यामुळे हार्दिक पटेल यांच्या प्रत्येक हालचालांवर सरकार आणि भाजपच्या नेत्यांचे लक्ष आहे. हार्दिकचा पाठींबा मिळवण्यासाठी काँग्रेससह भाजपचे नेतेही प्रयत्नात आहेत. मात्र हार्दिक आणि त्याच्या सहकार्यांचा कल हा सध्या तरी काँग्रेसकडे असल्याचे स्पष्ट आहे. त्यातूनच राहुल आणि हार्दिकच्या भेटीचे वृत्त समोर आले आहे. शिवाय राहुल गांधी बरोबर हात मिळवणी करायची असेल तर ती सर्वां समोर करेन हे हार्दिक यांचे वक्तव्य सर्व काही सांगून जाते.

Related posts

बेल्जियमची राणी मुंबईत

News Desk

Belgaum निवडणुकीत BJP ची सरशी…Sanjay Raut यांचा अपेक्षाभंग ?

News Desk

Manasi Devkar